शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

नगरपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 00:20 IST

बीड : जिल्ह्यातील चार ठिकाणच्या नगर पंचायतीचे मतदान रविवारी शांततेत पार पडले. सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात झाली होती.

बीड : जिल्ह्यातील चार ठिकाणच्या नगर पंचायतीचे मतदान रविवारी शांततेत पार पडले. सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात झाली होती. पुरूषांबरोबरच महिलांनी देखील उत्स्पूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. वडवणी, आष्टी, शिरूर कासार याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कुठल्याही गरबड-गोंधळाशिवाय मतदान पार पडले.मागील दहा दिवसांपासून जिल्हयातील चार ठिकाणी म्हणजेच वडवणी, आष्टी शिरूर कासार व पाटोदा या ठिकाणी नगर पंचायतींची रणधुमाळी सुरू होती. पहिल्यांदाच नगर पंचायतीच्या निवडणूका होत असल्याने प्रशासनाने शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी तयारी केली होती. सकळी दहा नंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. सकाळी ११ पर्यंत ५५ ते ६० टक्के मतदान झाले होते. मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून आली.सर्वाधिक शिरूर कासार येथे मतदान झाले. एकूण ३ हजार ९०२ मतदारांपैकी ३ हजार ५६८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही उमेदवारांनी मतदारांसाठी वाहन व्यवस्था केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत मते वळविण्याचा प्रयत्न उमेदवार, कार्यकर्त्यांकडून झाला.दरम्यान, सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. दुपारनंतर मतदारांचा ओघ काहीसा कमी झाला होता. ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)