शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

घरकुल योजनेचे ८० हजार अर्ज पडून

By admin | Updated: October 13, 2016 01:04 IST

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य गरीब नागरिकांनी हजारो रुपये खर्च करून महापालिकेने नेमून दिलेल्या संगणक

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य गरीब नागरिकांनी हजारो रुपये खर्च करून महापालिकेने नेमून दिलेल्या संगणक केंद्रांवर मोठ्या आशेने अर्ज दाखल केले. मागील दोन महिन्यांपासून हे सर्व अर्ज महापालिकेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांनी दाखल केलेले अर्ज राज्य शासनामार्फत केंद्राकडे जातील, या बाबतीत मनपाने चुप्पी साधली आहे. अर्ज दाखल केलेल्या नागरिकांचे डोळे आता अनुदानाकडे लागले आहेत.केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेत ‘प्रत्येक नागरिकाला घर’ असे घोषवाक्यच तयार करण्यात आले आहे. या योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्यासाठी मनपाची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेनेही मोठा गाजावाजा करून योजनेचा शुभारंभ केला. नागरिकांना अर्ज भरण्यासाठी शहरातील खाजगी संगणक केंद्रांची मदत घेण्यात आली. इंटरनेट कॅफे चालविणाऱ्यांनी अवाच्या सव्वा दर आकारून नागरिकांकडून अर्ज भरून घेतले. काही दलालांनी अर्ज भरण्यासाठी गरीब नागरिकांकडून हजारो रुपये उकळले. अवघ्या दीड महिन्यात शहरात ८० हजार ५५४ नागरिकांनी अर्ज भरले. शहरातील सर्व इंटरनेट कॅफेचालकांनी हे अर्ज मनपाकडे स्वाधीन केले.मागील दोन महिन्यांपासून नागरिकांचे अर्ज महापालिकेत धूळखात पडले आहेत. या अर्जाची तपासणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हे अर्ज स्कॅन करून राज्य शासनामार्फत केंद्राकडे कधी पाठविण्यात येतील याचा निश्चित कालावधीच ठरलेला नाही.