शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

चोरीच्या ८० % दुचाकी भंगारात

By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात.

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात. उर्वरित दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडाही होत नाही. चोरीला जाणाऱ्या एकूण दुचाकीपैकी ८० टक्के दुचाकी भंगारात विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. यातून चोरट्याला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये मिळतात.औरंगाबाद शहरात १५ पोलीस ठाणी आहेत. जानेवारीपासून मे अखेरपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे चारशे दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यात सिडकोमधून ६६, क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हदद्ीतून ६२ आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ४३ मोटारसायकल चोरीला गेल्या. दुचाकी चोरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत शहराबाहेर कसे बाहेर पडता येईल, याचा अभ्यास करून चोर दुचाकी चोरी करतात, त्यामुळे या ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक दुचाकी चोऱ्या होतात,असे पोलिसांचे म्हणणे आहे. एमआयडीसी वाळूज, जवाहरनगर आणि सिटी चौक पोलिस ठाण्यांच्या परिसरातून पाच महिन्यात सुमारे ४० दुचाकी चोरट्यांनी पळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ जिन्सी पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरट्यांनी पाच महिन्यांत २२ दुचाकी चोरून नेल्या होत्या. दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी सापळे रचतात. मात्र यात त्यांना यश मिळतेच, असे नाही. परिणामी दुचाकी चोरी उघड होण्याचे प्रमाण जास्तीत जास्त २० टक्के आहे.बेवारस अवस्थेत सोडून देतातकाही चोरटे चोरलेल्या दुचाकींचा कामापुरता वापर करतात. चोरीच्या दुचाकीत जोपर्यंत पेट्रोल आहे, तोपर्यत तिचा वापर करणे आणि जेथे पेट्रोल संपेल, तेथे दुचाकी सोडून निघून जाण्याची त्यांची पद्धत आहे. अशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या दुचाकी सापडतात. बऱ्याचदा या दुचाकीवरील क्रमांक बनावट असतो आणि चोरटे चेसीस क्रमांकाचीही खाडाखोड करीत असतात. त्यामुळे दुचाकीचा मालक पोलिसांना सापडत नाही. परिणामी अशा बेवारस दुचाकींचा भंगारात लिलाव करून त्यांची विक्री केली जाते. अशा प्रकारे शहरातील सुमारे साडेसहाशे दुचाकींची चार महिन्यापूर्वी पोलीस आयुक्तालयांत विक्री करण्यात आली.