शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

चोरीच्या ८० % दुचाकी भंगारात

By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात.

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात. उर्वरित दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडाही होत नाही. चोरीला जाणाऱ्या एकूण दुचाकीपैकी ८० टक्के दुचाकी भंगारात विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. यातून चोरट्याला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये मिळतात.औरंगाबाद शहरात १५ पोलीस ठाणी आहेत. जानेवारीपासून मे अखेरपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे चारशे दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यात सिडकोमधून ६६, क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हदद्ीतून ६२ आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ४३ मोटारसायकल चोरीला गेल्या. दुचाकी चोरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत शहराबाहेर कसे बाहेर पडता येईल, याचा अभ्यास करून चोर दुचाकी चोरी करतात, त्यामुळे या ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक दुचाकी चोऱ्या होतात,असे पोलिसांचे म्हणणे आहे. एमआयडीसी वाळूज, जवाहरनगर आणि सिटी चौक पोलिस ठाण्यांच्या परिसरातून पाच महिन्यात सुमारे ४० दुचाकी चोरट्यांनी पळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ जिन्सी पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरट्यांनी पाच महिन्यांत २२ दुचाकी चोरून नेल्या होत्या. दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी सापळे रचतात. मात्र यात त्यांना यश मिळतेच, असे नाही. परिणामी दुचाकी चोरी उघड होण्याचे प्रमाण जास्तीत जास्त २० टक्के आहे.बेवारस अवस्थेत सोडून देतातकाही चोरटे चोरलेल्या दुचाकींचा कामापुरता वापर करतात. चोरीच्या दुचाकीत जोपर्यंत पेट्रोल आहे, तोपर्यत तिचा वापर करणे आणि जेथे पेट्रोल संपेल, तेथे दुचाकी सोडून निघून जाण्याची त्यांची पद्धत आहे. अशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या दुचाकी सापडतात. बऱ्याचदा या दुचाकीवरील क्रमांक बनावट असतो आणि चोरटे चेसीस क्रमांकाचीही खाडाखोड करीत असतात. त्यामुळे दुचाकीचा मालक पोलिसांना सापडत नाही. परिणामी अशा बेवारस दुचाकींचा भंगारात लिलाव करून त्यांची विक्री केली जाते. अशा प्रकारे शहरातील सुमारे साडेसहाशे दुचाकींची चार महिन्यापूर्वी पोलीस आयुक्तालयांत विक्री करण्यात आली.