शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चोरीच्या ८० % दुचाकी भंगारात

By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात.

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरट्यांची धूूम सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १५ ते २० टक्के दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात येतात तर दहा टक्के गाड्या बेवारस अवस्थेत सापडतात. उर्वरित दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडाही होत नाही. चोरीला जाणाऱ्या एकूण दुचाकीपैकी ८० टक्के दुचाकी भंगारात विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. यातून चोरट्याला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये मिळतात.औरंगाबाद शहरात १५ पोलीस ठाणी आहेत. जानेवारीपासून मे अखेरपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे चारशे दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यात सिडकोमधून ६६, क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हदद्ीतून ६२ आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ४३ मोटारसायकल चोरीला गेल्या. दुचाकी चोरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत शहराबाहेर कसे बाहेर पडता येईल, याचा अभ्यास करून चोर दुचाकी चोरी करतात, त्यामुळे या ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक दुचाकी चोऱ्या होतात,असे पोलिसांचे म्हणणे आहे. एमआयडीसी वाळूज, जवाहरनगर आणि सिटी चौक पोलिस ठाण्यांच्या परिसरातून पाच महिन्यात सुमारे ४० दुचाकी चोरट्यांनी पळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ जिन्सी पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरट्यांनी पाच महिन्यांत २२ दुचाकी चोरून नेल्या होत्या. दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी सापळे रचतात. मात्र यात त्यांना यश मिळतेच, असे नाही. परिणामी दुचाकी चोरी उघड होण्याचे प्रमाण जास्तीत जास्त २० टक्के आहे.बेवारस अवस्थेत सोडून देतातकाही चोरटे चोरलेल्या दुचाकींचा कामापुरता वापर करतात. चोरीच्या दुचाकीत जोपर्यंत पेट्रोल आहे, तोपर्यत तिचा वापर करणे आणि जेथे पेट्रोल संपेल, तेथे दुचाकी सोडून निघून जाण्याची त्यांची पद्धत आहे. अशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या दुचाकी सापडतात. बऱ्याचदा या दुचाकीवरील क्रमांक बनावट असतो आणि चोरटे चेसीस क्रमांकाचीही खाडाखोड करीत असतात. त्यामुळे दुचाकीचा मालक पोलिसांना सापडत नाही. परिणामी अशा बेवारस दुचाकींचा भंगारात लिलाव करून त्यांची विक्री केली जाते. अशा प्रकारे शहरातील सुमारे साडेसहाशे दुचाकींची चार महिन्यापूर्वी पोलीस आयुक्तालयांत विक्री करण्यात आली.