शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ८० चौरस किलोमीटर ड्रोन सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० चौरस किमीचे ड्रोन सर्वेक्षण ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० चौरस किमीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किमान २०० कोटी रुपयांचा महसूल जमा व्हावा, हा या सर्वेक्षणामागील उद्देश आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मालमत्ता मूल्यांकनासाठी गुजरात येथील खासगी कंपनीची निवड करण्यात आली. एजन्सी निश्चित केल्यानंतर जीआयएस सर्वेक्षण प्रकल्प हाती घेतला. शहर १७० स्क्वेअर किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.

१३५ चौरस किलोमीटरपर्यंत ड्रोन सर्वेक्षणाला परवानगी मिळाली. उड्डाण क्षेत्र व अन्य काही क्षेत्र वगळण्यात आले. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (एनआरएससी) हैदराबाद यांच्याकडून उपग्रह प्रतिमा मिळवणे, हे जीआयएस प्रकल्पाचे वेगवेगळे घटक आहेत.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले की, दररोज ४.५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा ड्रोन सर्वेक्षण होत आहे. ड्रोन सर्वेक्षण एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. ड्रोन सर्वेक्षण डीजीपीएस यंत्रणेवर आधारित आहे. या प्रतिमांचा वापर करून, आम्ही झोन ९ पासून भौतिक सर्वेक्षण सुरू केले आहे.

मनपा आयुक्त व एएससीडीसीएल सीईओ यांनी एजन्सी आणि एएससीडीसीएलला या वर्षाच्या अखेरीस सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पुढील आर्थिक वर्षापर्यंत औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता नियमित होतील.

अनेक शहरांमध्ये प्रयोग यशस्वी

अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील काही मोठ्या शहरांना बराच फायदाही झाला आहे. त्यांच्या मालमत्ता करवसुलीतही फरक पडला आहे. आर्थिकरीत्या महापालिका सक्षम व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीने या प्रकल्पाची निवड केली.

मागील वर्षी फक्त १०७ कोटी वसूल

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी महापालिकेला मालमत्ता करातून पाहिजे तेवढा निधी मिळाला नाही. ४६८ कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त १०७ कोटी रुपयेच तिजोरीत आले. शहरात खासगी कंपनी असताना पाणीपट्टी वसुली ६० कोटींपर्यंत गेली होती. मागील वर्षी मनपाच्या तिजोरीत पाणीपट्टीचे २९ कोटी आले.