शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ८० चौरस किलोमीटर ड्रोन सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० चौरस किमीचे ड्रोन सर्वेक्षण ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० चौरस किमीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किमान २०० कोटी रुपयांचा महसूल जमा व्हावा, हा या सर्वेक्षणामागील उद्देश आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मालमत्ता मूल्यांकनासाठी गुजरात येथील खासगी कंपनीची निवड करण्यात आली. एजन्सी निश्चित केल्यानंतर जीआयएस सर्वेक्षण प्रकल्प हाती घेतला. शहर १७० स्क्वेअर किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.

१३५ चौरस किलोमीटरपर्यंत ड्रोन सर्वेक्षणाला परवानगी मिळाली. उड्डाण क्षेत्र व अन्य काही क्षेत्र वगळण्यात आले. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (एनआरएससी) हैदराबाद यांच्याकडून उपग्रह प्रतिमा मिळवणे, हे जीआयएस प्रकल्पाचे वेगवेगळे घटक आहेत.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले की, दररोज ४.५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा ड्रोन सर्वेक्षण होत आहे. ड्रोन सर्वेक्षण एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. ड्रोन सर्वेक्षण डीजीपीएस यंत्रणेवर आधारित आहे. या प्रतिमांचा वापर करून, आम्ही झोन ९ पासून भौतिक सर्वेक्षण सुरू केले आहे.

मनपा आयुक्त व एएससीडीसीएल सीईओ यांनी एजन्सी आणि एएससीडीसीएलला या वर्षाच्या अखेरीस सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पुढील आर्थिक वर्षापर्यंत औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता नियमित होतील.

अनेक शहरांमध्ये प्रयोग यशस्वी

अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील काही मोठ्या शहरांना बराच फायदाही झाला आहे. त्यांच्या मालमत्ता करवसुलीतही फरक पडला आहे. आर्थिकरीत्या महापालिका सक्षम व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीने या प्रकल्पाची निवड केली.

मागील वर्षी फक्त १०७ कोटी वसूल

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी महापालिकेला मालमत्ता करातून पाहिजे तेवढा निधी मिळाला नाही. ४६८ कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त १०७ कोटी रुपयेच तिजोरीत आले. शहरात खासगी कंपनी असताना पाणीपट्टी वसुली ६० कोटींपर्यंत गेली होती. मागील वर्षी मनपाच्या तिजोरीत पाणीपट्टीचे २९ कोटी आले.