शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

शहरात ८० चौरस किलोमीटर ड्रोन सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० चौरस किमीचे ड्रोन सर्वेक्षण ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० चौरस किमीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किमान २०० कोटी रुपयांचा महसूल जमा व्हावा, हा या सर्वेक्षणामागील उद्देश आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मालमत्ता मूल्यांकनासाठी गुजरात येथील खासगी कंपनीची निवड करण्यात आली. एजन्सी निश्चित केल्यानंतर जीआयएस सर्वेक्षण प्रकल्प हाती घेतला. शहर १७० स्क्वेअर किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.

१३५ चौरस किलोमीटरपर्यंत ड्रोन सर्वेक्षणाला परवानगी मिळाली. उड्डाण क्षेत्र व अन्य काही क्षेत्र वगळण्यात आले. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (एनआरएससी) हैदराबाद यांच्याकडून उपग्रह प्रतिमा मिळवणे, हे जीआयएस प्रकल्पाचे वेगवेगळे घटक आहेत.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले की, दररोज ४.५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा ड्रोन सर्वेक्षण होत आहे. ड्रोन सर्वेक्षण एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. ड्रोन सर्वेक्षण डीजीपीएस यंत्रणेवर आधारित आहे. या प्रतिमांचा वापर करून, आम्ही झोन ९ पासून भौतिक सर्वेक्षण सुरू केले आहे.

मनपा आयुक्त व एएससीडीसीएल सीईओ यांनी एजन्सी आणि एएससीडीसीएलला या वर्षाच्या अखेरीस सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पुढील आर्थिक वर्षापर्यंत औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता नियमित होतील.

अनेक शहरांमध्ये प्रयोग यशस्वी

अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील काही मोठ्या शहरांना बराच फायदाही झाला आहे. त्यांच्या मालमत्ता करवसुलीतही फरक पडला आहे. आर्थिकरीत्या महापालिका सक्षम व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीने या प्रकल्पाची निवड केली.

मागील वर्षी फक्त १०७ कोटी वसूल

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी महापालिकेला मालमत्ता करातून पाहिजे तेवढा निधी मिळाला नाही. ४६८ कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त १०७ कोटी रुपयेच तिजोरीत आले. शहरात खासगी कंपनी असताना पाणीपट्टी वसुली ६० कोटींपर्यंत गेली होती. मागील वर्षी मनपाच्या तिजोरीत पाणीपट्टीचे २९ कोटी आले.