शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

ग्रामीणमध्ये नव्या रुग्णांत ८० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर रुग्णांचे निदान होत गेले. हा आकडा कधी दीडशे पारही झाला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दररोज २० पेक्षा कमी रुग्णांचे ग्रामीण भागात निदान होत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम २६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही झपाट्याने कोरोनारुग्णांत वाढ झाली. आजघडीला ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने १५ हजारांचा आकडा पार केला आहे. ग्रामीण भागात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांत सर्वाधिक वाढ झाली. रोज १०० ते १५० च्या दरम्यान रुग्णांचे निदान होत गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणेची मोठी कसरत होत होती. ऑक्टोबरनंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. नोव्हेंबरमध्ये त्यात आणखी घट झाली. त्यानंतर आता गेल्या १० दिवसांपासू दररोज १२ ते २० च्या संख्येत कोरोना रुग्णांचे निदान होत आहे.

मृत्यूदर २.२ टक्के

ग्रामीण भागात आतापर्यंत ३३४ रुग्णांचे निदान झाले आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर २.२ टक्के एवढा आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.