शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

८० लाखांची वीज बिले माफ

By admin | Updated: May 28, 2014 01:12 IST

विजय गायकवाड, वैजापूर फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील ७५ गावांमधील जवळपास २ हजार शेतकर्‍यांच्या कृषिपंपाची वीज देयके माफ करण्यात आली आहेत

विजय गायकवाड, वैजापूर फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील ७५ गावांमधील जवळपास २ हजार शेतकर्‍यांच्या कृषिपंपाची वीज देयके माफ करण्यात आली आहेत. आपद्ग्रस्त शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून असे ६ महिन्यांची ८० लाख रुपयांची देयके माफीत बसणार आहेत. फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीने फळबागांसह ऊस, कांदे व अन्य बागायती पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर तहसील प्रशासनाने तात्काळ गारपीटग्रस्त गावांचे पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर सादर केला. गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने आपद्ग्रस्त गावांतील शेतकर्‍यांची विज देयके माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महावितरण कार्यालयाने तहसील कार्यालयाकडून आपद्ग्रस्त गावांची यादी मागवून पात्र ग्राहकांची वीज देयके माफ क रण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महावितरणच्या उपविभाग क्र. १ व २ अंतर्गत आपद्ग्रस्त ग्राहकांची संख्या जवळपास २ हजार आहे. अशा या पात्र शेतकर्‍यांना जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची वीज देयके माफ करण्यात येणार आहेत. साधारणत: कृ षिपंपाच्या सहा महिन्यांच्या देयकापोटी शासनाला ८० लाख रुपयांचा फटका पडणार आहे. तालुक्यातील कोरडगाव, हिलालपूर, पेंडेफळ, दहेगाव, गोलवाडी, पालखेड, खिर्डी, हरगोविंदपूर, भऊर, किरतपूर, लाखणी, पाथ्री, बायगाव, वीरगाव, मुर्शदपूर, सिद्धापूरवाडी, म्हस्की, भगूर, जळगाव, नांदगाव, चांडगाव, पानवी खंडाळा, पानवी खुर्द, बोरसर, खंबाळा, डवाळा, आलापूरवाडी, साफियाबादवाडी, शिऊर, महालगाव, माळीघोगरगाव, नादी, वक्ती, पानवी बु., जातेगाव, कौैटगाव, टेंभी, सटाणा, नागमठाण, अव्वलगाव, लाख खंडाळा, घायगाव, गाढेपिंपळगाव, वांजरगाव, सावखेडगंगा, हनमंतगाव, कापूसवाडगाव, नांदूरढोक, हमरापूर, वैजापूर, भग्गाव, सुराळा, बेलगाव, अगरसायगाव, शिवराई, नगिनापिंपळगाव, चेंडूफळ, सिरसगाव, जांबरगाव, मकरमतपूर, बाजाठाण, देवगाव शनी, तिडी, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बिलोणी, गोयगाव, फकिराबादवाडी, लाडगाव, चोरवाघलगाव व अन्य तीन अशा एकूण ७५ गावांतील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना या वीजमाफीचा फायदा होणार आहे. दरम्यान, आपद्ग्रस्त गावातील ज्या शेतकर्‍यांना वीजमाफीचा फायदा मिळाला नाही त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ७५ गावांसाठी २० कोटी ६ लाख ३८ हजार ४३ रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. गारपिटीने तालुक्यातील ७५ गावांतील १० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या नुकसानभरपाईपोटी २१ हजार ६७५ शेतकर्‍यांना आतापर्यंत १५ कोटी ४२ लाख ८५ हजार ७५ रुपयांचे वाटप करण्यात आले. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार, बागायती १५ हजार व जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये मदत जाहीर क रण्यात आली होती, असे तहसीलदार डॉ.प्रशांत पडघन व योगेश पुंड यांनी सांगितले.