शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

८० लाखांची वीज बिले माफ

By admin | Updated: May 28, 2014 01:12 IST

विजय गायकवाड, वैजापूर फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील ७५ गावांमधील जवळपास २ हजार शेतकर्‍यांच्या कृषिपंपाची वीज देयके माफ करण्यात आली आहेत

विजय गायकवाड, वैजापूर फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील ७५ गावांमधील जवळपास २ हजार शेतकर्‍यांच्या कृषिपंपाची वीज देयके माफ करण्यात आली आहेत. आपद्ग्रस्त शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून असे ६ महिन्यांची ८० लाख रुपयांची देयके माफीत बसणार आहेत. फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीने फळबागांसह ऊस, कांदे व अन्य बागायती पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर तहसील प्रशासनाने तात्काळ गारपीटग्रस्त गावांचे पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर सादर केला. गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने आपद्ग्रस्त गावांतील शेतकर्‍यांची विज देयके माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महावितरण कार्यालयाने तहसील कार्यालयाकडून आपद्ग्रस्त गावांची यादी मागवून पात्र ग्राहकांची वीज देयके माफ क रण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महावितरणच्या उपविभाग क्र. १ व २ अंतर्गत आपद्ग्रस्त ग्राहकांची संख्या जवळपास २ हजार आहे. अशा या पात्र शेतकर्‍यांना जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची वीज देयके माफ करण्यात येणार आहेत. साधारणत: कृ षिपंपाच्या सहा महिन्यांच्या देयकापोटी शासनाला ८० लाख रुपयांचा फटका पडणार आहे. तालुक्यातील कोरडगाव, हिलालपूर, पेंडेफळ, दहेगाव, गोलवाडी, पालखेड, खिर्डी, हरगोविंदपूर, भऊर, किरतपूर, लाखणी, पाथ्री, बायगाव, वीरगाव, मुर्शदपूर, सिद्धापूरवाडी, म्हस्की, भगूर, जळगाव, नांदगाव, चांडगाव, पानवी खंडाळा, पानवी खुर्द, बोरसर, खंबाळा, डवाळा, आलापूरवाडी, साफियाबादवाडी, शिऊर, महालगाव, माळीघोगरगाव, नादी, वक्ती, पानवी बु., जातेगाव, कौैटगाव, टेंभी, सटाणा, नागमठाण, अव्वलगाव, लाख खंडाळा, घायगाव, गाढेपिंपळगाव, वांजरगाव, सावखेडगंगा, हनमंतगाव, कापूसवाडगाव, नांदूरढोक, हमरापूर, वैजापूर, भग्गाव, सुराळा, बेलगाव, अगरसायगाव, शिवराई, नगिनापिंपळगाव, चेंडूफळ, सिरसगाव, जांबरगाव, मकरमतपूर, बाजाठाण, देवगाव शनी, तिडी, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बिलोणी, गोयगाव, फकिराबादवाडी, लाडगाव, चोरवाघलगाव व अन्य तीन अशा एकूण ७५ गावांतील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना या वीजमाफीचा फायदा होणार आहे. दरम्यान, आपद्ग्रस्त गावातील ज्या शेतकर्‍यांना वीजमाफीचा फायदा मिळाला नाही त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ७५ गावांसाठी २० कोटी ६ लाख ३८ हजार ४३ रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. गारपिटीने तालुक्यातील ७५ गावांतील १० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या नुकसानभरपाईपोटी २१ हजार ६७५ शेतकर्‍यांना आतापर्यंत १५ कोटी ४२ लाख ८५ हजार ७५ रुपयांचे वाटप करण्यात आले. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार, बागायती १५ हजार व जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये मदत जाहीर क रण्यात आली होती, असे तहसीलदार डॉ.प्रशांत पडघन व योगेश पुंड यांनी सांगितले.