शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

जिल्हा परिषदेच्या आठशे शाळा झाल्या ‘हायटेक’

By admin | Updated: July 15, 2016 01:10 IST

विजय सरवदे , औरंगाबाद एकीकडे ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा भविष्यात टिकतील की नाही, या विवंचनेत असलेले शिक्षक अंग झटकून कामाला लागले आहेत

विजय सरवदे , औरंगाबादएकीकडे ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा भविष्यात टिकतील की नाही, या विवंचनेत असलेले शिक्षक अंग झटकून कामाला लागले आहेत. कठोर परिश्रम घेऊन लोकसहभागातून शिक्षकांनी जवळपास ८०० शाळा ‘हायटेक’ केल्या आहेत. विशेष म्हणजे जि. प. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येतही अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झालेली आहे. जि. प. शाळांमधील शिक्षण म्हटले की सर्वसामान्यांच्या कपाळावर अठ्याच पडतात. जि. प. शाळांमधील मुलांना लिहिता- वाचताही येत नाही, असे बोलले जात असल्यामुळे ग्रामीण नागरिकही खाजगी शाळांनाच पसंती देत आहेत. परिणामी जि. प. शाळांतील विद्यार्थी संख्या घटल्यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यावर ‘शिक्षक सेने’ने ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ हा रामबाण उपाय सुचविला. संबंधित शाळांतील शिक्षक व लोकसहभागातून संगणक, टीव्ही स्क्रीन, प्रोजेक्टर घेतले. शिक्षक सेनेने ई- अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर पुरविले. बघता बघता व्हर्च्युअल क्लासरूममुळे शिक्षणात नवचैतन्य आले. अनेक विद्यार्थी शाळेकडे वळू लागले. दर्जेदार व भविष्याचा वेध घेणारे शिक्षण सुरू झाले. मुले चार भिंतीपलीकडे ‘आॅनलाईन’ शोध घेत अध्ययनात रमली. जगाशी ‘व्हर्च्युअल’ नातं जोडल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळू लागल्या. आज दुसऱ्याही संघटनांच्या अनेक शिक्षकांनी ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ सुरू केल्या आहेत.यासंदर्भात शिक्षक सेनेने गेल्या वर्षी ५०० जि. प. शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ केल्याचा दावा जिल्हा सरचिटणीस सदानंद माडेवार यांनी केला. ते म्हणाले की, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा पठारावस्थेत होत्या. तेथील मुले शाळा सोडून जात होती. अलीकडे व्हर्च्युुअल क्लासरूममुळे शाळांत दर्जेदार शिक्षण मिळू लागल्यामुळे मुले तर सक्षमपणे टिकलीच, पण खाजगी इंग्रजी शाळेत गेलेली मुलेही शाळेत परतू लागली आहेत. गेल्या वर्षी जि. प. शाळांमध्ये सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी संख्या वाढली होती. यंदा किमान पाच हजारांपर्यंत ती संख्या गेली असावी, अशी शक्यता माडेवार यांनी व्यक्त केली. यासोबतच जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेनेही शिक्षक सेनेच्या व्हर्च्युअल क्लासरूम या उपक्रमाला मोलाची साथ देत ५०० पेक्षा जास्त शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ करण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘ज्ञानरचनावाद’मुळे ऊर्जितावस्था तर आलीच, पण व्हर्च्युअल क्लासरूमसारख्या चळवळीने मोठा बदल घडला आहे. ४शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारली जाते. केवळ वीज बिल न भरल्यामुळे अनेक शाळांमधील कनेक्शन तोडण्यात आलेले आहे. वीज बिलाची तरतूद कशी करणार, हा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. ४यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, जि. प. शाळांना देखभाल, दुरुस्ती आणि शाळा अनुदान दिले जाते. त्यातून त्यांनी वीज बिल भरावे. वीज बिलासाठी शासनाकडून दुसरे कसलेही अनुदान मिळत नाही.