शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

हदगावात ४ वर्षांत ८ पोलिस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

By admin | Updated: July 10, 2014 00:44 IST

हदगाव : हदगाव पोलिस ठाण्यातून गत चार वर्षांत आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याची बाब समोर आली आहे.

हदगाव : हदगाव पोलिस ठाण्यातून गत चार वर्षांत आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याची बाब समोर आली आहे. यापैकी एकाही पोलिस निरीक्षकाने आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही किंवा त्यांना कार्यकाळ पूर्ण करु देण्यात आला नाही. परिणामी शासकीय कामात राजकीय हस्तक्षेप किती वाढला याचे हे उदाहरण असल्याची चर्चा रंगत आहे.७ मार्च २०१० रोजी उत्तम मुंडे यांनी पदभार घेतला. ते ७ मार्च २०११ पर्यंत कार्यरत होते. यानंतर पी. जी. गायकवाड यांनी ७ मार्च २०११ रोजी पदभार घेतला. यानंतर ४ एप्रिल २०११ रोजी त्यांची बदली झाली.यानंतर आर. बी. केंद्रे ४ एप्रिल २०११ ते २२ सप्टेंबर २०१३ पर्यंत राहिले. यानंतर २२ सप्टेंबर २०१३ ते १३ नोव्हेंबर २०१३ पर्यंत राजा टेहरे यांनी कारभार स्वीकारला. दोन महिन्यांतच ते बाद झाले. यानंतर १४ नोव्हेंबर १३ ते ३ मार्च १४ काळात साहेबराव नरवाडे रुजू झाले. यानंतर ३ मार्च २०१४ रोजी अरुण बस्ते जालन्यावरुन येथे रुजू झाले. हिमायतनगर येथून लोहा येथे गेलेले गौतम यांची पुन्हा हिमायतनगरला बदली झाली. रमेशकुमार स्वामी हे हदगावला आले. शासन जीआरप्रमाणे एका पोलिस निरीक्षकचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. परंतु तक्रारीमुळे त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली जाते. हदगाव शहरात शासकीय कर्मचाऱ्यांना राजकीय दबावाचे बळी व्हावे लागते किंवा ठाण्यातील अंतर्गत कलहाचाही फटका बसत आहे. राजकीय पुढाऱ्याला किंवा त्यांच्या कार्यकर्त्याची नाराजी ओढवून घेतल्यास त्यांची बदली करण्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीवृत्तीला आळा बसण्याऐवजीे भर पडत आहे. कोणतेही कारण नसताना होणाऱ्या बदल्यामुळे उलट-सुलट चर्चा रंगत आहे.(वार्ताहर)