शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

१०० दिवसात मिळाले केवळ ८१९ कुटुंबांच्या डोक्यावर छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:05 IST

महाआवास ग्रामीण योजना थंडावली : २२ हजार १६२ कुटुंब घराच्या प्रतीक्षेत, खुलताबाद, सिल्लोड, सोयगावचे काम मंदावले --- लोकमत न्यूज ...

महाआवास ग्रामीण योजना थंडावली : २२ हजार १६२ कुटुंब घराच्या प्रतीक्षेत, खुलताबाद, सिल्लोड, सोयगावचे काम मंदावले

---

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्यात मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी महाआवास ग्रामीण योजनेतून १०० दिवसात विविध योजनांचा कृतीसंगम घडवून लाभार्थ्याला घरकुल उभारुन देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, १०० दिवसात केवळ ८१९ घरकुलांची उभारणी झाली. जिल्ह्यात घरकुल उभारणी ४४.४० टक्क्यांपुढे गेली नाही. मंजूर ३९ हजार २५ घरांपैकी केवळ १७ हजार ७०० घरकुले पूर्ण झाली असून, २२ हजार १६२ कुटुंब डोक्यावर हक्काचे छत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

२० नोव्हेंबर २०२०ला राष्ट्रीय घरकुल दिनानिमित्त सुरु झालेल्या योजनेवेळी ३९ हजार ८६२ घरकुल बांधणीचे उद्दिष्ट होते. त्यावेळी जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी तर १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली होती. गेल्या १०० दिवसात केवळ ८१९ घरकुले बांधून पूर्ण झाली तर ७ हजार ३२६ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली. आता २२ हजार १६२ घरकुले विविध कारणांनी पूर्ण झालेली नाहीत. पंतप्रधान, रमाई, शबरी, पारधी आवास योजना या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. प्रत्यक्षात गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ही कामे होतात.

कोरोनाचा प्रादुर्भाव महाआवास योजनेच्या सुरुवातीपासून पुढील १०० दिवस कमी होता. मात्र, तिन्ही योजनांचे काम ४५ टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकले नाही. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या खुलताबाद, ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील घरकुले पूर्ण होण्याचे प्रमाण सर्वात कमी असून, गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यात काम अधिक झालेले दिसते.

---

पंतप्रधान आवास योजनेची

५ वर्षातील १० हजार ८९२ घरकुले अपूर्ण

---

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये २०१६-१७चे ६६१, २०१७-१८चे ३५४, २०१८-१९चे २४२, २०१९-२०चे २,८२६, २०२०-२१चे ६,८०९ अशी १० हजार ९९२ घरे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. तर या योजनेतून ११ हजार २७१ घरे पूर्ण झाली. म्हणजेच मंजूर घरकुलांपैकी ५०.८६ टक्के लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झाले. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक काम या योजनेतून झाले असून, सोयगाव तालुक्यात सर्वात कमी काम झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

---

रमाई योजनेची ३४.५१ टक्के घरकुले पूर्णत्वास

--

रमाई आवास योजनेतून गेल्या पाच वर्षात १५ हजार २९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४ हजार ६७४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मध्यंतरी निधीअभावी घरकुले अपूर्ण अवस्थेत होती. मात्र, जानेवारीच्या सुमारास निधीचा प्रश्न सुटल्याने रमाई घरकुल योजनेच्या कामाला गती आली. आतापर्यंत ५ हजार २७९ घरे पूर्ण झाली तर १० हजार १८ घरे अपूर्ण असून, हे प्रमाण केवळ ३४.५१ टक्के आहे. खुलताबाद तालुक्याचे सर्वाधिक काम असून, तुलनेत औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील काम कमी दिसते.

----

‘शबरी आवास’चे ४७.४७ टक्के काम

---

शबरी आवास योजनेतून २,२३२ घरकुलांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १,१२३ घरे पूर्ण झाली असून, १ हजार २३४ घरे अपूर्ण आहेत. खुलताबाद तालुक्याचे काम सर्वाधिक ६८.५२ टक्के काम झाले असून, सर्वात कमी काम औरंगाबाद तालुक्याचे आहे.