शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

पुरवठाधारक कंपनीला ८ दिवसांचा अल्टीमेटम !

By admin | Updated: February 6, 2015 00:56 IST

हणमंत गायकवाड ,लातूर अपंगांना वाटप करण्यात आलेल्या मिनी पिठाच्या गिरण्या नादुरुस्त आहेत. दर्जाहीन गिरण्या असल्यामुळे लाभार्थ्यांना त्याचा उपयोग नाही,

हणमंत गायकवाड ,लातूरअपंगांना वाटप करण्यात आलेल्या मिनी पिठाच्या गिरण्या नादुरुस्त आहेत. दर्जाहीन गिरण्या असल्यामुळे लाभार्थ्यांना त्याचा उपयोग नाही, ही बाब ‘लोकमत’ने समोर आणताच प्रशासन खडबडून जागे झाले असून, पुरवठाधारक कंपनीला सगळ्याच गिरण्या आठ दिवसांच्या आत बदलून द्या; अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने वस्तूंच्या खरेदीसाठी सॅम्पल तपासणी समिती स्थापना केली आहे.अपंगांना जिल्ह्यात १३३ मिनी पिठाच्या गिरण्या वाटप करण्यात आल्या आहेत. यातील १२६ गिरण्या बंद आहेत. या गिरण्यांतून दळण दळले जात नाही. दळले तरी पाळूचा खरडा येतो. शिवाय, गिरणीची मोटार पाच-दहा मिनिटांत तापून बंद पडते, अशा कारणांनी १२६ मिनी पिठाच्या गिरण्या बंद आहेत. ‘लोकमत’ने प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सर्व्हे करून गिरण्यांची स्थिती जाणून घेतल्यानंतर ही विदारक स्थिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाने ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची गंभीर दखल घेत बीड येथील पुरवठाधारक लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीला आठ दिवसांत नादुरुस्त गिरण्या दुरुस्त करून द्याव्यात अथवा बदलून द्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. आठ दिवसांत गिरण्या बदलून न दिल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही कंपनीला कळविण्यात आले आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांना भ्रमणध्वनीवरून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे यांनी गिरण्या बदलून देण्यासंदर्भातही संवाद साधला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. अपंगांसह मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यांना देण्यात येणारे साहित्य दर्जेदार मिळावे, त्यावर त्यांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून यापुढे वस्तूंची खरेदी करण्यासाठी सॅम्पल तपासणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सदर वस्तू चांगली आहे म्हटल्यानंतरच खरेदी होणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सॅम्पल तपासणी समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. \‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन मिनी पिठाच्या गिरण्यांची गुरुवारी तपासणी केली. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात चार ठिकाणी वाटप केलेल्या मिनी गिरण्यांची स्थिती पाहिली आहे. या पाहणीचा अहवाल तीन दिवसांत प्रशासनाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई होईल, असे अतिरिक्त सीईओ महेश मेघमाळे यांनी सांगितले.