शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

विधानसभेच्या रणधुमाळीस ७९ दिवस ?

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.राज्याच्या दहाव्या विधानसभेचा कार्यकाळ १७ आॅक्टोबर १९९९ रोजी संपला होता. त्यानंतर अकराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २००४ रोजी संपला. त्यानंतर आता चालू असलेल्या बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २०१४ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी तेरावी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा ३१ आॅगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाली. १८ सप्टेंंबर २००९ रोजी या निवडणूकीची अधिसुचना जारी झाली होती. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी राज्यातील ८२ हजार २८ मतदार केंद्रांवर मतदान झाले होते. तर २२ आॅक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. मागील विधानसभेचा कार्यकाळ लक्षात घेता यावेळी ३१ आॅगस्ट पुर्वी किंवा १ ते २ सप्टेंबर या कालावधीत तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ९ जून रोजी १ जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवरील दावे व हरकती ९ ते ३० जून दरम्यान स्विकारण्यात येणार आहे. तसेच आलेल्या दावे व हरकतीची प्रकरणे १५ जुलै पर्यंत निकाली काढण्यात येणार असून २५ जुलै रोजी परिपुर्ण मतदार यादीचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. ३१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राजकीय नेते मंडळींना ६८ दिवसांचा वेळविधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय नेते मंडळींना अंदाजे ६८ दिवसांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. लागलीच आचारसंहिता लागू होईल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २५ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर साधारणपणे ३१ आॅगस्टपर्यंत नेते मंडळींना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही राजकीय नेते मंडळींनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.तीन मतदारसंघात ८ लाख १४ हजार मतदारजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत ८ लाख १४ हजार २९३ मतदार आहेत. त्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात २ लाख ५८ हजार ५१६, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ३६० आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ४१७ मतदार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमामुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.२००९ मध्ये ३१ आॅगस्ट रोजी झाली होती निवडणुकीची घोषणा१३ आॅक्टोबर २००९ रोजी मतदान झाल्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी झाली होती मतमोजणीयावेळेसही ३१ आॅगस्टपुर्वी किंवा त्याच्या एक- दोन दिवसानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.