शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या रणधुमाळीस ७९ दिवस ?

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.राज्याच्या दहाव्या विधानसभेचा कार्यकाळ १७ आॅक्टोबर १९९९ रोजी संपला होता. त्यानंतर अकराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २००४ रोजी संपला. त्यानंतर आता चालू असलेल्या बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २०१४ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी तेरावी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा ३१ आॅगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाली. १८ सप्टेंंबर २००९ रोजी या निवडणूकीची अधिसुचना जारी झाली होती. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी राज्यातील ८२ हजार २८ मतदार केंद्रांवर मतदान झाले होते. तर २२ आॅक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. मागील विधानसभेचा कार्यकाळ लक्षात घेता यावेळी ३१ आॅगस्ट पुर्वी किंवा १ ते २ सप्टेंबर या कालावधीत तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ९ जून रोजी १ जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवरील दावे व हरकती ९ ते ३० जून दरम्यान स्विकारण्यात येणार आहे. तसेच आलेल्या दावे व हरकतीची प्रकरणे १५ जुलै पर्यंत निकाली काढण्यात येणार असून २५ जुलै रोजी परिपुर्ण मतदार यादीचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. ३१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राजकीय नेते मंडळींना ६८ दिवसांचा वेळविधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय नेते मंडळींना अंदाजे ६८ दिवसांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. लागलीच आचारसंहिता लागू होईल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २५ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर साधारणपणे ३१ आॅगस्टपर्यंत नेते मंडळींना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही राजकीय नेते मंडळींनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.तीन मतदारसंघात ८ लाख १४ हजार मतदारजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत ८ लाख १४ हजार २९३ मतदार आहेत. त्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात २ लाख ५८ हजार ५१६, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ३६० आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ४१७ मतदार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमामुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.२००९ मध्ये ३१ आॅगस्ट रोजी झाली होती निवडणुकीची घोषणा१३ आॅक्टोबर २००९ रोजी मतदान झाल्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी झाली होती मतमोजणीयावेळेसही ३१ आॅगस्टपुर्वी किंवा त्याच्या एक- दोन दिवसानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.