शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विधानसभेच्या रणधुमाळीस ७९ दिवस ?

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.राज्याच्या दहाव्या विधानसभेचा कार्यकाळ १७ आॅक्टोबर १९९९ रोजी संपला होता. त्यानंतर अकराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २००४ रोजी संपला. त्यानंतर आता चालू असलेल्या बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २०१४ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी तेरावी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा ३१ आॅगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाली. १८ सप्टेंंबर २००९ रोजी या निवडणूकीची अधिसुचना जारी झाली होती. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी राज्यातील ८२ हजार २८ मतदार केंद्रांवर मतदान झाले होते. तर २२ आॅक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. मागील विधानसभेचा कार्यकाळ लक्षात घेता यावेळी ३१ आॅगस्ट पुर्वी किंवा १ ते २ सप्टेंबर या कालावधीत तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ९ जून रोजी १ जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवरील दावे व हरकती ९ ते ३० जून दरम्यान स्विकारण्यात येणार आहे. तसेच आलेल्या दावे व हरकतीची प्रकरणे १५ जुलै पर्यंत निकाली काढण्यात येणार असून २५ जुलै रोजी परिपुर्ण मतदार यादीचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. ३१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राजकीय नेते मंडळींना ६८ दिवसांचा वेळविधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय नेते मंडळींना अंदाजे ६८ दिवसांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. लागलीच आचारसंहिता लागू होईल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २५ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर साधारणपणे ३१ आॅगस्टपर्यंत नेते मंडळींना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही राजकीय नेते मंडळींनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.तीन मतदारसंघात ८ लाख १४ हजार मतदारजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत ८ लाख १४ हजार २९३ मतदार आहेत. त्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात २ लाख ५८ हजार ५१६, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ३६० आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ४१७ मतदार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमामुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.२००९ मध्ये ३१ आॅगस्ट रोजी झाली होती निवडणुकीची घोषणा१३ आॅक्टोबर २००९ रोजी मतदान झाल्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी झाली होती मतमोजणीयावेळेसही ३१ आॅगस्टपुर्वी किंवा त्याच्या एक- दोन दिवसानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.