शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

७८ शहर बसेस सेवेत

By admin | Updated: March 20, 2016 23:59 IST

औरंगाबाद : रिक्षाचालकांनी पुकारलेल्या तीनदिवसीय बंदमुळे एस.टी.महामंडळ खडबडून जागे झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सोमवारपासून ७८ शहर बस चालविण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : रिक्षाचालकांनी पुकारलेल्या तीनदिवसीय बंदमुळे एस.टी.महामंडळ खडबडून जागे झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सोमवारपासून ७८ शहर बस चालविण्यात येणार आहेत. यासाठी चालक-वाहकांच्या उपलब्धतेसाठी सिडको बसस्थानकातील लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीची जबाबदारी अन्य आगारांवर सोपविण्यात आली आहे.२१ ते २३ मार्चदरम्यान रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळाने शहर बसच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मीटर सक्तीच्या निर्णयामुळे १५ मार्चपासून शहर बसची संख्या २९ वरून ५१ करण्यात आली. या ५१ शहर बसेसद्वारे विविध मार्गांवर १ हजार २९ फेऱ्या करण्याचे नियोजन महामंडळाने केले. आता रिक्षा बंद आंदोलनामुळे शहर बसची संख्या ५१ वरून ७८ करण्यात येत आहे. ७८ बसेसद्वारे १ हजार ५४५ फेऱ्या करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अन्य आगारांमधून चालक-वाहक येत आहेत. रिक्षा बंदमुळे एस.टी.ने जोरदार तयारी केली आहे.सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या बसेसचे नियोजन अन्य आगारांवर देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ शहर बससेवा सुरळीतपणे चालविण्यावर सिडको बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करता येणार आहे.