शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

७७ लाखांचे गौडबंगाल !

By admin | Updated: November 12, 2014 00:25 IST

कळंब : महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत आलेल्या ७७ लाखांचे कळंब तालुका कृषी कार्यालयाने नेमके केले काय? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.

कळंब : महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत आलेल्या ७७ लाखांचे कळंब तालुका कृषी कार्यालयाने नेमके केले काय? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. या कार्यालयाने ज्या कामांवर हा खर्च दाखविला त्यातील काही कामांच्या अस्तित्वावरच बोट ठेवले जावू लागले आहे.उन्मेष पाटील ल्ल कळंबतालुका कृषी कार्यालयाने आॅन रेकॉर्ड १७ गावातील बंधाऱ्यांच्या कामावर हे ७७ लाख रु. खर्चल्याचे कागदावर दाखविले आहे. हे काम कोणत्या गावात झाले याची माहिती कार्यालयाकडे आहे. परंतु ते कोणत्या क्षेत्रात झाले? त्याचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर काय आहे? याची स्पष्ट माहिती कृषी कार्यालयाकडे उपलब्ध आहे की नाही ही बाबही हे कार्यालय उघडपणे सांगत नाही. या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा कोणत्या गटनंबरमध्ये समावेश आहे, याबाबतची रंजक माहिती या कार्यालयाने दिली. उदाहरणार्थ एका गावामध्ये पाच बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम केले असतील तर गट नंबरमध्ये १,२,३,४,५, असे सरळ आकडे ठोकून दिले आहेत. ज्या गावात जेवढी कामे त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या भागाचे गटनंबर टाकले आहेत. कृषी विभागाने या कामात अशी चलाखी केली असताना या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाबच विचारला नसावा? की वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या ७७ लाखाच्या अभियानामध्ये सोईस्करपणे दूर्लक्ष केले, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सदरील कामांतील या सावळ्या गोंधळाची जिल्हा स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.या अभियानांतर्गत १७ गावात ७३ बंधाऱ्यावर ही रक्कम खर्चल्याचे कृषी कार्यालयाचे म्हणणे आहे. परंतु काही गावात एवढे बंधारे आहेत का? की गटनंबर सारखे हे बंधारेही बोगस आहेत, असा सवाल उपस्थित होतो आहे. एखाद्या कामावर शासन लाखो रुपयाचा निधी देत असेल तर त्या कामांची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असताना हा आंधळा कारभार चालतो कसा, ही बाब धक्कादायक आहे.सिमेंट बंधारा व माती नाला बांधकामाच्या दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी फार फार तर २० ते ३० हजार रुपये खर्च आला असता असे या क्षेत्रातील मंडळीचे म्हणणे आहे. सिमेंट बंधाऱ्याचा गाळ काढण्यासाठी १० तास जेसिबी चालवून काम केले असले तरी ते १० हजार रुपये झाले असते. मग ही अंदाजपत्रके फुगविली कोणी? त्याचे दरपत्रक बनविले कोणी? त्याचे ओपन टेंडर का काढले नाही? ही बाबही प्रकर्षाने पुढे येत आहे. एकाच योजनेचे ७७ लाख रुपयाची माती होत असेल तर या कार्यालयाकडील इतर मोजनांचे आॅडिट करायला पाहिजे, असे सूर व्यक्त होत आहे.कळंब तालुक्यातील १७ बंधाऱ्यांवर ७७ लाख रूपये खर्च झाल्याची प्रशासनाच्या दप्तरी नोंद.४एका गावामध्ये पाच बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम केले असतील तर गट नंबरमध्ये १,२,३,४,५, असे सरळ आकडे ठोकून दिले आहेत. ४दुरूस्ती आणि गाळ काढणीवर हजारोंचा खर्च अपेक्षित असताना बहुतांश बंधाऱ्यांवर केला लाखोंचा खर्च.४दुरूस्तीच्या कामांच्या चौकशीसाठी जिल्हास्तरावरून समिती नेमण्याची ग्रामस्थांतून होतेय मागणी.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तालुका कृषी कार्यालय खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती अधिकाराखाली मागितलेल्या अपिलाची सुनावणी मंगळवारी करण्यात आली. या अधिकाऱ्यांशी संबंधित सर्व माहिती पाच दिवसात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय अपिलीय अधिकारी तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अर्जदारांना लेखी स्वरुपात दिला.