शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

७७ लाखांचे गौडबंगाल !

By admin | Updated: November 12, 2014 00:25 IST

कळंब : महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत आलेल्या ७७ लाखांचे कळंब तालुका कृषी कार्यालयाने नेमके केले काय? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.

कळंब : महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत आलेल्या ७७ लाखांचे कळंब तालुका कृषी कार्यालयाने नेमके केले काय? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. या कार्यालयाने ज्या कामांवर हा खर्च दाखविला त्यातील काही कामांच्या अस्तित्वावरच बोट ठेवले जावू लागले आहे.उन्मेष पाटील ल्ल कळंबतालुका कृषी कार्यालयाने आॅन रेकॉर्ड १७ गावातील बंधाऱ्यांच्या कामावर हे ७७ लाख रु. खर्चल्याचे कागदावर दाखविले आहे. हे काम कोणत्या गावात झाले याची माहिती कार्यालयाकडे आहे. परंतु ते कोणत्या क्षेत्रात झाले? त्याचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर काय आहे? याची स्पष्ट माहिती कृषी कार्यालयाकडे उपलब्ध आहे की नाही ही बाबही हे कार्यालय उघडपणे सांगत नाही. या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा कोणत्या गटनंबरमध्ये समावेश आहे, याबाबतची रंजक माहिती या कार्यालयाने दिली. उदाहरणार्थ एका गावामध्ये पाच बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम केले असतील तर गट नंबरमध्ये १,२,३,४,५, असे सरळ आकडे ठोकून दिले आहेत. ज्या गावात जेवढी कामे त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या भागाचे गटनंबर टाकले आहेत. कृषी विभागाने या कामात अशी चलाखी केली असताना या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाबच विचारला नसावा? की वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या ७७ लाखाच्या अभियानामध्ये सोईस्करपणे दूर्लक्ष केले, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सदरील कामांतील या सावळ्या गोंधळाची जिल्हा स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.या अभियानांतर्गत १७ गावात ७३ बंधाऱ्यावर ही रक्कम खर्चल्याचे कृषी कार्यालयाचे म्हणणे आहे. परंतु काही गावात एवढे बंधारे आहेत का? की गटनंबर सारखे हे बंधारेही बोगस आहेत, असा सवाल उपस्थित होतो आहे. एखाद्या कामावर शासन लाखो रुपयाचा निधी देत असेल तर त्या कामांची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असताना हा आंधळा कारभार चालतो कसा, ही बाब धक्कादायक आहे.सिमेंट बंधारा व माती नाला बांधकामाच्या दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी फार फार तर २० ते ३० हजार रुपये खर्च आला असता असे या क्षेत्रातील मंडळीचे म्हणणे आहे. सिमेंट बंधाऱ्याचा गाळ काढण्यासाठी १० तास जेसिबी चालवून काम केले असले तरी ते १० हजार रुपये झाले असते. मग ही अंदाजपत्रके फुगविली कोणी? त्याचे दरपत्रक बनविले कोणी? त्याचे ओपन टेंडर का काढले नाही? ही बाबही प्रकर्षाने पुढे येत आहे. एकाच योजनेचे ७७ लाख रुपयाची माती होत असेल तर या कार्यालयाकडील इतर मोजनांचे आॅडिट करायला पाहिजे, असे सूर व्यक्त होत आहे.कळंब तालुक्यातील १७ बंधाऱ्यांवर ७७ लाख रूपये खर्च झाल्याची प्रशासनाच्या दप्तरी नोंद.४एका गावामध्ये पाच बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम केले असतील तर गट नंबरमध्ये १,२,३,४,५, असे सरळ आकडे ठोकून दिले आहेत. ४दुरूस्ती आणि गाळ काढणीवर हजारोंचा खर्च अपेक्षित असताना बहुतांश बंधाऱ्यांवर केला लाखोंचा खर्च.४दुरूस्तीच्या कामांच्या चौकशीसाठी जिल्हास्तरावरून समिती नेमण्याची ग्रामस्थांतून होतेय मागणी.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तालुका कृषी कार्यालय खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती अधिकाराखाली मागितलेल्या अपिलाची सुनावणी मंगळवारी करण्यात आली. या अधिकाऱ्यांशी संबंधित सर्व माहिती पाच दिवसात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय अपिलीय अधिकारी तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अर्जदारांना लेखी स्वरुपात दिला.