शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

चावडी वाचनासाठी ७५० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:04 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या शेतकºयांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ७५० अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या शेतकºयांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ७५० अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापूर्वी देखील सलग दोन वर्षे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी आर्थिक पेचात सापडल्याने राज्य शासनाने थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदार शेतक्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक होते. यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रावरुन हे आॅनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत, अशा शेतकºयांच्या याद्या जिल्हा प्रशासनाने तयार केल्या आहेत. तालुकानिहाय आणि गावनिहाय याद्यांचे काम पूर्ण झाले असून १ व २ आॅक्टोबर रोजी या याद्यांचे प्रत्यक्ष चावडी वाचन केले जाणार आहे. या चावडी वाचना दरम्यान शेतकºयांना काही शंका असतील तर त्याही विचारता येणार आहेत. त्यामुळे चावडी वाचनाची ही प्रक्रिया सुरु झाली असून चावडी वाचन करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात सुमारे ७५० अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये हे चावडी वाचन करण्यासाठी ६७९ अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव, कृषी सहाय्यक आदी अधिकारी- कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चावडी वाचनाच्या दरम्यान ९४ पर्यवेक्षकही नियुक्त केले आहेत. सहायक निबंधक, सहकार निबंधक, तहसीलदार, नायब तहसीलदार, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी आदी अधिकाºयांना पर्यवेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून १ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष गावात जाऊन चावडी वाचन होणार आहे.