शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

७५ बंधाऱ्यांना कामांची प्रतीक्षा!

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे. जलयुक्त शिवार योजनंतर्गत नद्यांच्या पुनरूज्जीवन माध्यमातून नद्यांवर सिमेंट साखळी बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढावी हा त्यामागचा उद्देश. यात प्रामुख्याने नद्यांचे खोलीकरण तसेच अन्य कामे केली जात आहेत. पुनरूज्जीवन कामांमुळे गाव परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच हजारो एकर जमीन सिंचनाखाली आल्याचे चित्र आहे. २०९ साखळी बंधाऱ्यांपैकी ७५ कामे सुरूच न झाल्याने त्या त्या गावातील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जलयुक्त कामांमध्येच नदी पुनरूज्जीवनची कामे असून यासाठी आठ तालुक्यांसाठी ५५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जालना तालुक्यात ९ गावांत मंजुरी मिळाली आहे. ११ साखळी बंधारे पूर्ण झाले असून, २ कामे प्रगतीपथावर आहेत. बदनापूर तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा मंजूर झाला असून, १० गावांत ३४ बंधारे होणार आहेत. तर १२ कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदन तालुक्यात १३ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर असून, २० गावांत ३३ सिमेंट साखळी बंधारे होत आहेत. १२ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ८० सघमी एवढा पाणीसाठा झाला आहे. जाफराबाद तालुक्यात १२. ४१ कोटींचा निधी मंजूर झाला असून, १४ गावांत २८ बंधारे होणार असून, पैकी ८ कामे पूर्ण झाली आहेत. ३ कामे प्रगतीपथावर आहेत. परतूर तालुक्यात ८ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.१३ गावांमध्ये ५४ बंधारे होणार असून ३६ कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे प्रगतीपथावर आहेत. ५६० सघमी जलसाठा झाला आहे. मंठा तालुक्यात १० कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला असून, १७ गावांत ४९ बंधारे होणार असून, १९ कामे पूर्ण झाली आहेत. १३ कामे प्रगतीपथावर आहेत. ३४० सहस्त्र घनमीटर (सघमी) एवढा जलसाठा झाला आहे.