शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

७५ बंधाऱ्यांना कामांची प्रतीक्षा!

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे. जलयुक्त शिवार योजनंतर्गत नद्यांच्या पुनरूज्जीवन माध्यमातून नद्यांवर सिमेंट साखळी बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढावी हा त्यामागचा उद्देश. यात प्रामुख्याने नद्यांचे खोलीकरण तसेच अन्य कामे केली जात आहेत. पुनरूज्जीवन कामांमुळे गाव परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच हजारो एकर जमीन सिंचनाखाली आल्याचे चित्र आहे. २०९ साखळी बंधाऱ्यांपैकी ७५ कामे सुरूच न झाल्याने त्या त्या गावातील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जलयुक्त कामांमध्येच नदी पुनरूज्जीवनची कामे असून यासाठी आठ तालुक्यांसाठी ५५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जालना तालुक्यात ९ गावांत मंजुरी मिळाली आहे. ११ साखळी बंधारे पूर्ण झाले असून, २ कामे प्रगतीपथावर आहेत. बदनापूर तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा मंजूर झाला असून, १० गावांत ३४ बंधारे होणार आहेत. तर १२ कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदन तालुक्यात १३ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर असून, २० गावांत ३३ सिमेंट साखळी बंधारे होत आहेत. १२ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ८० सघमी एवढा पाणीसाठा झाला आहे. जाफराबाद तालुक्यात १२. ४१ कोटींचा निधी मंजूर झाला असून, १४ गावांत २८ बंधारे होणार असून, पैकी ८ कामे पूर्ण झाली आहेत. ३ कामे प्रगतीपथावर आहेत. परतूर तालुक्यात ८ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.१३ गावांमध्ये ५४ बंधारे होणार असून ३६ कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे प्रगतीपथावर आहेत. ५६० सघमी जलसाठा झाला आहे. मंठा तालुक्यात १० कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला असून, १७ गावांत ४९ बंधारे होणार असून, १९ कामे पूर्ण झाली आहेत. १३ कामे प्रगतीपथावर आहेत. ३४० सहस्त्र घनमीटर (सघमी) एवढा जलसाठा झाला आहे.