शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

७५ बंधाऱ्यांना कामांची प्रतीक्षा!

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे. जलयुक्त शिवार योजनंतर्गत नद्यांच्या पुनरूज्जीवन माध्यमातून नद्यांवर सिमेंट साखळी बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढावी हा त्यामागचा उद्देश. यात प्रामुख्याने नद्यांचे खोलीकरण तसेच अन्य कामे केली जात आहेत. पुनरूज्जीवन कामांमुळे गाव परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच हजारो एकर जमीन सिंचनाखाली आल्याचे चित्र आहे. २०९ साखळी बंधाऱ्यांपैकी ७५ कामे सुरूच न झाल्याने त्या त्या गावातील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जलयुक्त कामांमध्येच नदी पुनरूज्जीवनची कामे असून यासाठी आठ तालुक्यांसाठी ५५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जालना तालुक्यात ९ गावांत मंजुरी मिळाली आहे. ११ साखळी बंधारे पूर्ण झाले असून, २ कामे प्रगतीपथावर आहेत. बदनापूर तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा मंजूर झाला असून, १० गावांत ३४ बंधारे होणार आहेत. तर १२ कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदन तालुक्यात १३ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर असून, २० गावांत ३३ सिमेंट साखळी बंधारे होत आहेत. १२ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ८० सघमी एवढा पाणीसाठा झाला आहे. जाफराबाद तालुक्यात १२. ४१ कोटींचा निधी मंजूर झाला असून, १४ गावांत २८ बंधारे होणार असून, पैकी ८ कामे पूर्ण झाली आहेत. ३ कामे प्रगतीपथावर आहेत. परतूर तालुक्यात ८ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.१३ गावांमध्ये ५४ बंधारे होणार असून ३६ कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे प्रगतीपथावर आहेत. ५६० सघमी जलसाठा झाला आहे. मंठा तालुक्यात १० कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला असून, १७ गावांत ४९ बंधारे होणार असून, १९ कामे पूर्ण झाली आहेत. १३ कामे प्रगतीपथावर आहेत. ३४० सहस्त्र घनमीटर (सघमी) एवढा जलसाठा झाला आहे.