शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दुधना प्रकल्पात ७३ टक्के साठा

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात प्रथमच ७३ टक्के जलसाठा झाल्यामुळे सेलू शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मोहन बोराडे, सेलूनिम्न दुधना प्रकल्पात प्रथमच ७३ टक्के जलसाठा झाल्यामुळे सेलू शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ३१ आॅगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दुधना प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाल्यामुळे सेलू शहराचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात केवळ ४१ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा ओघ वेगाने झाला. परिणामी ४ सप्टेंबर रोजी प्रकल्पात २५१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात १४८ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. तीनच दिवसांत प्रकल्पाच्या पाणीपातळीत जवळपास दुपटीनेच वाढ झाली असल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचा आगामी काळात सिंचनासाठी देखील वापर होण्याची शक्यता होणार आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून शहराला मिळते. प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाल्यामुळे सेलू शहरवासिय सुखावले आहेत. प्रकल्पाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याची तयारी करण्यात आली आहे. आणखी पावसाळ्याचा एक महिना असल्यामुळे टप्याटप्याने पाणीसाठा करण्यात येत आहे. पाणीपातळीत झपाट्याने वाढनिम्न दुधना प्रकल्पाच्या निर्मितीनंतर प्रथमच ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा होता. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रकल्पात केवळ ४१ टक्के पाणी होते. परंतु, तीन दिवसांच्या पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी मिळण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान डाव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर उजव्या कालव्याचीही काही कि.मी. अंतराची पाणी सोडून चाचणीही झाली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.