शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

जलयुक्त शिवारच्या ७२ कामांमध्ये सावळा गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:44 IST

अंबड : जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अंबड : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपये खर्चाच्या एकूण ७२ कामांमध्ये अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला असून, या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथक व गुणनियंत्रक पथकामार्फत सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सातत्याने दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची शेती टंचाईमुक्त करुन शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करुन जलयुक्त शिवार योजनेस सुुरुवात केली. जलयुक्त शिवार म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १) पाणलोट विकासाची कामे, २) साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्याची कामे नाला खोलीकरण/रुंदीकरण/ सरळीकरणासह करणे, ३)जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन करणे, ४)अस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनाची (केटी वेअर/साठवण बंधारा) दुरुस्ती करणे. ५) पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे. ६)पाझर तलाव/गाव तलाव/साठवण तलाव/शिवकालीन तलाव/ ब्रिटीशकालीन तलाव/ निजामकालीन तलाव/माती नालाबांधातील गाळ काढणे. ७)मध्यम व मोठया प्रकल्पांचा सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे. ८) छोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे . ९) विहीर/बोअरवेल पुनर्भरण कामे. १०)उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर. ११) पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे. १२)पाणी वापर संस्था बळकट करणे. १३) कालवा दुरुस्त करणे. अशा १३ प्रकारच्या कामांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे. या १३ प्रकारची कामे करुन पावसाचे जास्तीस जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, गावातील भूगर्भातील जलपातळीत वाढ करुन गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वरील १३ पैकी केवळ नदी नाल्यांचे खोलीकरण/रुंदीकरण/ सरळीकरण व कंपार्टमेंट बंडिंग ही भ्रष्टाचाराच्या दृष्टीने सोयीची असलेली दोन प्रकारचीच कामे अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आली आहेत. अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या या ७२ कामांमध्ये अनेक तांत्रिक बाबींना सोयीस्करपणे वगळुन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार घनश्याम शाहूराव साबळे व रमेश शशिकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.