शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या ७२ कामांमध्ये सावळा गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:44 IST

अंबड : जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अंबड : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपये खर्चाच्या एकूण ७२ कामांमध्ये अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला असून, या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथक व गुणनियंत्रक पथकामार्फत सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सातत्याने दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची शेती टंचाईमुक्त करुन शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करुन जलयुक्त शिवार योजनेस सुुरुवात केली. जलयुक्त शिवार म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १) पाणलोट विकासाची कामे, २) साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्याची कामे नाला खोलीकरण/रुंदीकरण/ सरळीकरणासह करणे, ३)जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन करणे, ४)अस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनाची (केटी वेअर/साठवण बंधारा) दुरुस्ती करणे. ५) पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे. ६)पाझर तलाव/गाव तलाव/साठवण तलाव/शिवकालीन तलाव/ ब्रिटीशकालीन तलाव/ निजामकालीन तलाव/माती नालाबांधातील गाळ काढणे. ७)मध्यम व मोठया प्रकल्पांचा सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे. ८) छोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे . ९) विहीर/बोअरवेल पुनर्भरण कामे. १०)उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर. ११) पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे. १२)पाणी वापर संस्था बळकट करणे. १३) कालवा दुरुस्त करणे. अशा १३ प्रकारच्या कामांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे. या १३ प्रकारची कामे करुन पावसाचे जास्तीस जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, गावातील भूगर्भातील जलपातळीत वाढ करुन गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वरील १३ पैकी केवळ नदी नाल्यांचे खोलीकरण/रुंदीकरण/ सरळीकरण व कंपार्टमेंट बंडिंग ही भ्रष्टाचाराच्या दृष्टीने सोयीची असलेली दोन प्रकारचीच कामे अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आली आहेत. अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या या ७२ कामांमध्ये अनेक तांत्रिक बाबींना सोयीस्करपणे वगळुन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार घनश्याम शाहूराव साबळे व रमेश शशिकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.