शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

एका जोडणीसाठी ७० हजार खर्च

By admin | Updated: May 12, 2015 00:49 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या पाणीसाठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे डिमांड भरूनही वीज कनेक्शन देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७ हजार १७६ शेतकऱ्यांनी कृषी पंपांना वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडे ३५ कोटी ६८ लाख रुपये भरले आहेत. मात्र, अद्याप या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शासन शेतकऱ्यांच्या उच्चाटनासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती व्यवसायाच्या विकासाच्या नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात खर्च करुन विहीर, बोअरवेल घेतले. मात्र, त्याला वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाणी असूनही ते पिकांना देत येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाकडे खेटे मारत आहेत. मार्च २०१४ अखेर जिल्ह्यातील ९ हजार ५२९ शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शन मियण्यासाठी महावितरणकडे नियमानुसार डिमांड भरले. मात्र, यातील ६ हजार ६८ शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालेले नाही. तर मार्च २०१५ अखेरपर्यंत वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ७ हजार १७६ वर जावून पोहोंचला आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना विद्युत कनेक्शन देण्यासाठी २५ शेतकऱ्यांमध्ये एक डीपी असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना सरासरी तीन विद्युत खांबाची आवश्यता असते. एका शेतकऱ्याला वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणला ७० हजार रुपये खर्च करावे लागतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी २० कोटी रुपयांचे आॅनलाईन टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महावितण कार्यालयातील सुत्रांनी दिली.