शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

एका जोडणीसाठी ७० हजार खर्च

By admin | Updated: May 12, 2015 00:49 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या पाणीसाठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे डिमांड भरूनही वीज कनेक्शन देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७ हजार १७६ शेतकऱ्यांनी कृषी पंपांना वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडे ३५ कोटी ६८ लाख रुपये भरले आहेत. मात्र, अद्याप या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शासन शेतकऱ्यांच्या उच्चाटनासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती व्यवसायाच्या विकासाच्या नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात खर्च करुन विहीर, बोअरवेल घेतले. मात्र, त्याला वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाणी असूनही ते पिकांना देत येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाकडे खेटे मारत आहेत. मार्च २०१४ अखेर जिल्ह्यातील ९ हजार ५२९ शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शन मियण्यासाठी महावितरणकडे नियमानुसार डिमांड भरले. मात्र, यातील ६ हजार ६८ शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालेले नाही. तर मार्च २०१५ अखेरपर्यंत वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ७ हजार १७६ वर जावून पोहोंचला आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना विद्युत कनेक्शन देण्यासाठी २५ शेतकऱ्यांमध्ये एक डीपी असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना सरासरी तीन विद्युत खांबाची आवश्यता असते. एका शेतकऱ्याला वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणला ७० हजार रुपये खर्च करावे लागतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी २० कोटी रुपयांचे आॅनलाईन टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महावितण कार्यालयातील सुत्रांनी दिली.