शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

शहरातील तीन मतदारसंघांत ७ जणांचे अर्ज

By admin | Updated: September 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : शहरातील तिन्ही मतदारसंघांतून बुधवारी सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

औरंगाबाद : शहरातील तिन्ही मतदारसंघांतून बुधवारी सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून प्रत्येकी दोघांनी, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून तिघा जणांनी उमेदवारी अर्ज भरले. दरम्यान, पितृपक्ष संपल्यामुळे उद्यापासून प्रमुख उमेदवारही आपले उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून प्रकाश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर किस्मतवाला शेख खाजा यांनी गरीब आदमी पार्टीच्या वतीने उमेदवारी दाखल केली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काझी सय्यदोद्दीन जहीर अहमद यांनी उमेदवारी दाखल केली. याच मतदारसंघातून आज नगरसेवक मधुकर सावंत यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मोबीनोद्दीन खदीरोद्दीन सिद्दीकी आणि शेख रफिक शेख रज्जाक या दोन अपक्षांसह तिघा जणांनी उमेदवारी अर्ज भरले. तसेच पैठण मतदारसंघातून शैलेश रणपिसे आणि रियाज शेख बादशहा शेख या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघांत मात्र आज एकही उमेदवारी अर्ज आला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.मात्र, पितृपक्ष सुरू असल्यामुळे आजपर्यंत तुरळक उमेदवारांनीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आता पितृपक्ष संपला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारपासून उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार उद्या आणि परवा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.