शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

मराठवाड्यात वर्षभरात विजेचे ६९ बळी

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागात १ जून २०१४ ते २० मे २०१५ पर्यंत नियमित पावसाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे ६९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विभागात १ जून २०१४ ते २० मे २०१५ पर्यंत नियमित पावसाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे ६९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यासंबंधीचे नियोजन मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. यावेळी सर्व यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.मागील ११ महिन्यांत पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विभागात मोठ्या प्रमाणात शेतीमालासह जीवित हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, ब्रिगेडिअर मनोज कुमार, कर्नल ए.के.दत्ता, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग, जालन्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक, नांदेडचे सुरेश काकाणी, लातूरचे पांडुरंग पोले, परभणीचे राहुल रंजन महिवाल, बीडचे नवल किशोर राम, हिंगोलीचे प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी, पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बिराजदार, सर्व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, ऊर्जा, आरोग्य, दूरसंचार, नगरप्रशासन इ. विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील एकूण पूर्वतयारीचे सादरीकरण केले. विभागातील सर्व धरणांशी निगडीत माहिती संगणक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याचे बिराजदार यांनी सांगितले. विभागात २००५ आणि २००६ मध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. गेल्या दोन वर्षांत अपुरा पाऊस झाला आहे. मात्र त्याचा परिणाम पूर्वतयारीवर होऊ नये. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले जावेत. सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय ठेवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी बैठकीत केले.