शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

मराठवाड्यात वर्षभरात विजेचे ६९ बळी

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागात १ जून २०१४ ते २० मे २०१५ पर्यंत नियमित पावसाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे ६९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विभागात १ जून २०१४ ते २० मे २०१५ पर्यंत नियमित पावसाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे ६९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यासंबंधीचे नियोजन मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. यावेळी सर्व यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.मागील ११ महिन्यांत पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विभागात मोठ्या प्रमाणात शेतीमालासह जीवित हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, ब्रिगेडिअर मनोज कुमार, कर्नल ए.के.दत्ता, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग, जालन्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक, नांदेडचे सुरेश काकाणी, लातूरचे पांडुरंग पोले, परभणीचे राहुल रंजन महिवाल, बीडचे नवल किशोर राम, हिंगोलीचे प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी, पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बिराजदार, सर्व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, ऊर्जा, आरोग्य, दूरसंचार, नगरप्रशासन इ. विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील एकूण पूर्वतयारीचे सादरीकरण केले. विभागातील सर्व धरणांशी निगडीत माहिती संगणक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याचे बिराजदार यांनी सांगितले. विभागात २००५ आणि २००६ मध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. गेल्या दोन वर्षांत अपुरा पाऊस झाला आहे. मात्र त्याचा परिणाम पूर्वतयारीवर होऊ नये. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले जावेत. सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय ठेवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी बैठकीत केले.