शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

६५ लाख विद्यार्थ्यांची घेणार कल चाचणी; पण प्रवेशाची हमी नाही

By admin | Updated: November 16, 2015 00:40 IST

औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभरात फक्त ५३९ समुपदेशक असल्याने या चाचण्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. चाचणीनंतर विद्यार्थ्याचा कल समजला तरी आवडीच्या क्षेत्रात मात्र प्रवेश देण्याची हमी मात्र घेतली जाणार नाही.विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन आवडीनुसार व क्षमतेनुसार शैक्षणिक क्षेत्र निवडीस वेळीच मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना पुरेसा वाव मिळतो, ही गोष्ट लक्षात घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून, त्यामध्ये ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु राज्यात सध्या फक्त ५३९ समुपदेशकच कार्यरत आहेत. त्यामुळे कल चाचण्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. बहुतांश मानसोपचारतज्ज्ञ खाजगी सेवेत असल्याने कल चाचण्यांसाठी तयार होतील काय, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.कल समजण्यासाठीचदहावीनंतर विद्यार्थी कुठल्या क्षेत्रात करिअर करूशकतो, याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी या हेतूनेच या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.कल चाचणी व प्रवेश प्रक्रिया यांचा कसलाही संबंध असणार नसून, संबंधित क्षेत्रात प्रवेशासाठी मदत केली जाणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.