शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जाधववाडीत ६५ लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत.

औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत. याविरोधात मागील शुक्रवारपासून जाधववाडीतील धान्य व फळ-भाजीपाल्याचे अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, दैनंदिन ६५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. या बंदचा फटका शेतकऱ्यांपासून ते हमालांपर्यंत सर्वांना बसत आहे. जाधववाडीत दररोज सुमारे ८०० पेक्षा अधिक शेतकरी फळे-पालेभाज्या घेऊन येत. मात्र, अडत्यांच्या बंदमुळे मंगळवारी पहाटे सुमारे १०० ते १५० शेतकरी माल घेऊन आले होते. मागील काही दिवसांत पडलेल्या संततधारेमुळे शेतांमध्ये पालेभाज्या खराब झाल्या. त्याचा परिणाम अडत बाजारात पाहण्यास मिळाला. फळभाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटली होती. जो शेतीमाल आला, तो उतरून घेण्यास अडत्यांनी नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांनी परिसरातच उघड्यावर पालेभाजी विक्रीला सुरुवात केली. आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाले होते. शहरातील अन्य भाजी मंडईतील विक्रेते फळभाज्या खरेदीसाठी आले तर त्यांना शेतकऱ्यांना रोख रक्कम द्यावी लागत होती. जुनी उधारी फेडायची व अडत्याकडून नवीन पालेभाज्या उधारीवर घेऊन जाण्याची प्रथा येथे असल्याने अनेक विके्रत्यांनी कमी पैसे सोबत आणले होते. शेतकरी उधारीवर माल देत नसल्याने या विक्रेत्यांनी कमी पालेभाज्या खरेदी केल्या. कारभारी सोनवणे या शेतकऱ्याने सांगितले की, आवक कमी असल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळाला. पहिले १३ कॅरेट विक्री झाले; पण शिल्लक ७ कॅरेट विकताना दमछाक झाली. आबासाहेब काथार या शेतकऱ्याने सांगितले की, विक्रेत्यांना अडत्याकडून उधारीवर माल घेण्याची सवय असल्याने आम्हाला रोख रक्कम देण्याची त्यांची मानसिकता नाही. कैलास जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, रोख रक्कम देताना पालेभाज्यांचे भाव विक्रेते पाडून मागत होते. नंतर कमी-जास्त करून आम्ही पालेभाज्या विक्री केल्या.धान्याच्या अडत बाजारातही बेमुदत बंदचा मंगळवारी चौथा दिवस होता. हर्राशी झाली नाही. सर्व अडत व्यापारी गटा-गटाने चर्चा करताना दिसून आले. बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ म्हणाले की, अडत व्यवहार बंद असल्याने फळ बाजारात दैनंदिन ४० लाख व धान्य अडत बाजारात २५ लाख असे ६५ लाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.