शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीत ६५ लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत.

औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत. याविरोधात मागील शुक्रवारपासून जाधववाडीतील धान्य व फळ-भाजीपाल्याचे अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, दैनंदिन ६५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. या बंदचा फटका शेतकऱ्यांपासून ते हमालांपर्यंत सर्वांना बसत आहे. जाधववाडीत दररोज सुमारे ८०० पेक्षा अधिक शेतकरी फळे-पालेभाज्या घेऊन येत. मात्र, अडत्यांच्या बंदमुळे मंगळवारी पहाटे सुमारे १०० ते १५० शेतकरी माल घेऊन आले होते. मागील काही दिवसांत पडलेल्या संततधारेमुळे शेतांमध्ये पालेभाज्या खराब झाल्या. त्याचा परिणाम अडत बाजारात पाहण्यास मिळाला. फळभाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटली होती. जो शेतीमाल आला, तो उतरून घेण्यास अडत्यांनी नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांनी परिसरातच उघड्यावर पालेभाजी विक्रीला सुरुवात केली. आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाले होते. शहरातील अन्य भाजी मंडईतील विक्रेते फळभाज्या खरेदीसाठी आले तर त्यांना शेतकऱ्यांना रोख रक्कम द्यावी लागत होती. जुनी उधारी फेडायची व अडत्याकडून नवीन पालेभाज्या उधारीवर घेऊन जाण्याची प्रथा येथे असल्याने अनेक विके्रत्यांनी कमी पैसे सोबत आणले होते. शेतकरी उधारीवर माल देत नसल्याने या विक्रेत्यांनी कमी पालेभाज्या खरेदी केल्या. कारभारी सोनवणे या शेतकऱ्याने सांगितले की, आवक कमी असल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळाला. पहिले १३ कॅरेट विक्री झाले; पण शिल्लक ७ कॅरेट विकताना दमछाक झाली. आबासाहेब काथार या शेतकऱ्याने सांगितले की, विक्रेत्यांना अडत्याकडून उधारीवर माल घेण्याची सवय असल्याने आम्हाला रोख रक्कम देण्याची त्यांची मानसिकता नाही. कैलास जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, रोख रक्कम देताना पालेभाज्यांचे भाव विक्रेते पाडून मागत होते. नंतर कमी-जास्त करून आम्ही पालेभाज्या विक्री केल्या.धान्याच्या अडत बाजारातही बेमुदत बंदचा मंगळवारी चौथा दिवस होता. हर्राशी झाली नाही. सर्व अडत व्यापारी गटा-गटाने चर्चा करताना दिसून आले. बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ म्हणाले की, अडत व्यवहार बंद असल्याने फळ बाजारात दैनंदिन ४० लाख व धान्य अडत बाजारात २५ लाख असे ६५ लाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.