शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

६४४ उमेदवारांनी घेतली माघार..!

By admin | Updated: February 8, 2017 00:26 IST

जालना : जिल्ह्यात ५६ गटांसाठी तर ११२ गणांसाठी असे ७३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जालना : जिल्ह्यात ५६ गटांसाठी तर ११२ गणांसाठी असे ७३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात जि.प.साठी २६४ तर पंचायत समितीसाठी ४७२ उमेदवार रिंगणात आहे. गटातून २३४ तर गणातून ४१० असे एकूण ६४४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.जालना तालुक्यातून गटासाठी ५६ तर पंचायत समिती गणासाठी ८६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता गटात ५४ व गणात ८८ उमेदवार निवडणूक रिंग्ांणात आहेत. बदनापूर तालुक्यात ५ गटात २९ तर १० गणात जवळपास ५० उमेदवार रिंगणात आहेत. अंबड तालुक्यात गटात ३३ तर गणात ५७ उमेदवार, मंठा तालुक्यात गटांत २७ व गणात ४९ उमेदवार रिंगणात आहेत. घनसावंगी तालुक्यात होत असलेल्या जि. प.च्या ८ गटासाठी ३२ तर पं.स. १६ गणासाठी ६० उमेदवारी रिंगणात उरले आहेत. परतूर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी गटातील ४९ जणापैकी १९ जणांनी माघार घेतली. पंचायत समिती गणातील ८८ पैकी ४० जणांनी माघार घेतली असून गटात ३० तर गणात ४८ उमेदवार रिंंगणात आहेत. जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटात १९ तर पंचायत समितीच्या ९ गणात ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पाच गटांतून ३४ तर पंचायत समितीच्या नऊ गणातून ३९ उमेदवारांनी माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मध्ये लढती पाहावयास मिळणार आहेत. दोन गटात तिरंगी तर व इतर तीन गटांत चौरंगी व पंचरंगी होणार आहे. भोकरदन तालुक्यात ११ गटांसाठी ४० उमेदवार तर २२ गणासांठी ८० उमेदवार रिंगणात आहेत. गटांतून ३६ तर गणांतून ६५ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यावरून अनेक गट व गणातील उमेदवारांमध्ये वाद झाले. तालुक्यात आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काही गट व गणात भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांत सरळ लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून दिग्गज उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे आहेत.