शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

६४४ उमेदवारांनी घेतली माघार..!

By admin | Updated: February 8, 2017 00:26 IST

जालना : जिल्ह्यात ५६ गटांसाठी तर ११२ गणांसाठी असे ७३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जालना : जिल्ह्यात ५६ गटांसाठी तर ११२ गणांसाठी असे ७३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात जि.प.साठी २६४ तर पंचायत समितीसाठी ४७२ उमेदवार रिंगणात आहे. गटातून २३४ तर गणातून ४१० असे एकूण ६४४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.जालना तालुक्यातून गटासाठी ५६ तर पंचायत समिती गणासाठी ८६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता गटात ५४ व गणात ८८ उमेदवार निवडणूक रिंग्ांणात आहेत. बदनापूर तालुक्यात ५ गटात २९ तर १० गणात जवळपास ५० उमेदवार रिंगणात आहेत. अंबड तालुक्यात गटात ३३ तर गणात ५७ उमेदवार, मंठा तालुक्यात गटांत २७ व गणात ४९ उमेदवार रिंगणात आहेत. घनसावंगी तालुक्यात होत असलेल्या जि. प.च्या ८ गटासाठी ३२ तर पं.स. १६ गणासाठी ६० उमेदवारी रिंगणात उरले आहेत. परतूर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी गटातील ४९ जणापैकी १९ जणांनी माघार घेतली. पंचायत समिती गणातील ८८ पैकी ४० जणांनी माघार घेतली असून गटात ३० तर गणात ४८ उमेदवार रिंंगणात आहेत. जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटात १९ तर पंचायत समितीच्या ९ गणात ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पाच गटांतून ३४ तर पंचायत समितीच्या नऊ गणातून ३९ उमेदवारांनी माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मध्ये लढती पाहावयास मिळणार आहेत. दोन गटात तिरंगी तर व इतर तीन गटांत चौरंगी व पंचरंगी होणार आहे. भोकरदन तालुक्यात ११ गटांसाठी ४० उमेदवार तर २२ गणासांठी ८० उमेदवार रिंगणात आहेत. गटांतून ३६ तर गणांतून ६५ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यावरून अनेक गट व गणातील उमेदवारांमध्ये वाद झाले. तालुक्यात आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काही गट व गणात भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांत सरळ लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून दिग्गज उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे आहेत.