शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांना टंचाईचा विळखा !

By admin | Updated: December 19, 2015 23:50 IST

रमेश शिंदे , औसा यंदाच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील ६४ गावांना हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

रमेश शिंदे , औसायंदाच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील ६४ गावांना हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाच गावांना टँकरद्वारे तर २० गावांना २५ अधिग्रहणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १३ प्रस्ताव मंडळ अधिकाऱ्यांकडे तर १३ प्रस्ताव क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाहणीसाठी पाठविण्यात आले आहेत. टंचाईमुळे नागरिकांचा जीव व्याकूळ झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून औसा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. गेल्यावर्षी १६५ अधिग्रहणांद्वारे आणि पाच टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा तर त्यापेक्षाही कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबरमध्येच तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. सध्या कार्ला, टाका, तांबरवाडी, नागरसोगा, चिंचोली सोन या पाच गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आलमला, मासुर्डी, शिवणी लख व शिवणी लख वाडी-तांडा या गावांनी चार टँकरची मागणी केली आहे. तालुक्यातील वांगजी, कोरंगळा, एकंबी, बोरफळ, सिंदाळा (लो.), अपचुंदा, बेलकुंड, कवळी, बऱ्हाणपूर, यल्लोरीवाडी, किनीनवरे, जावळी, तुंगी (बु.), जमालपूर, किनीथोट, वरवडा, कन्हेरी, मासुर्डी, जयनगर, सारोळा यासह ६४ गावांनी अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. सध्या २५ अधिग्रहणांना मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत आहे. त्यामुळे पाणी विक्रीचा व्यवसायही वाढला असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात अबालवृद्ध पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.