शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

६४ हजार नागरिकांनी उघडले बँक खाते

By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST

लातूर : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,

लातूर : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ६४० नागरिकांनी या योजनेसाठी खाते उघडले आहे. गेल्या आठ दिवसांत आकडा ६४ हजारांवर गेला आहे. परिणामी, जिल्ह्यातील २३ बँकांत या योजनेसाठी ग्राहकांची गर्दी आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीनवज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजना या तिन्ही लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत़ या योजनेचे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे लातुरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात भाजपाचे खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ़ पांडुरंग पोले, एस़बी़आयचे महाप्रबंधक रघुनाथ लोटे, अरूण महाजन यांंच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे़या तीनही विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी किफायतशीर व लाभदायक आहेत़ यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १८ ते ७० वयोगटांतील नागरिकाला २५ मेपर्यंत आधार प्रत व १२ रूपये प्रिमियम भरून सहभागी होता येणार असल्याने या योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ या योजनेअंतर्गत ४१ हजार ५३२ नागरिकांनी बँकेत जावून आपापले खाते काढून १२ रूपयांचा प्रिमियम भरला आहे़ योजनेत सहभागी नागरिकाला वर्षभरात २ लाखाचे अपघाती विमा संरक्षण, अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंगा पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रूपये व अपघातामुळे अर्ध अपंगत्व आल्यास १ लाखाचे विमा सरंक्षण मिळणार आहे़प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजनेत ३३० रूपाचा प्रिमियम भरून लाभ नागरिकाला घेता येणार आहे़ १८ ते ५० वयोगटांतील नागरिकांना बँकेत खाते काढून आधार क्रमांक देवून या बिमा योजनेत सहभागी होता येणार आहे़ (प्रतिनिधी)भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जीवनज्योत बीमा योजना, अटल पेन्शन विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या तीन योजना ९ मे रोजी सुरू केल्या आहेत़ यामध्ये सर्वसामान्याला किफायतशीर व लाभदायक असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या मोहिमेअंतर्गत वार्षिक प्रिमीयम फक्त १२ रूपये व त्या माध्यमातून मिळणारे लाभ सर्वसामान्यांसाठी लाभदायक व मोठ्या प्रमाणात असल्याने या विमा योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या योजनेअंतर्गत आठ दिवसांत ४१ हजार ५९५ नागरिकांनी बँकेत खाते उघडले आहेत.