शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

६४ हजार नागरिकांनी उघडले बँक खाते

By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST

लातूर : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,

लातूर : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ६४० नागरिकांनी या योजनेसाठी खाते उघडले आहे. गेल्या आठ दिवसांत आकडा ६४ हजारांवर गेला आहे. परिणामी, जिल्ह्यातील २३ बँकांत या योजनेसाठी ग्राहकांची गर्दी आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीनवज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजना या तिन्ही लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत़ या योजनेचे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे लातुरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात भाजपाचे खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ़ पांडुरंग पोले, एस़बी़आयचे महाप्रबंधक रघुनाथ लोटे, अरूण महाजन यांंच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे़या तीनही विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी किफायतशीर व लाभदायक आहेत़ यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १८ ते ७० वयोगटांतील नागरिकाला २५ मेपर्यंत आधार प्रत व १२ रूपये प्रिमियम भरून सहभागी होता येणार असल्याने या योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ या योजनेअंतर्गत ४१ हजार ५३२ नागरिकांनी बँकेत जावून आपापले खाते काढून १२ रूपयांचा प्रिमियम भरला आहे़ योजनेत सहभागी नागरिकाला वर्षभरात २ लाखाचे अपघाती विमा संरक्षण, अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंगा पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रूपये व अपघातामुळे अर्ध अपंगत्व आल्यास १ लाखाचे विमा सरंक्षण मिळणार आहे़प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजनेत ३३० रूपाचा प्रिमियम भरून लाभ नागरिकाला घेता येणार आहे़ १८ ते ५० वयोगटांतील नागरिकांना बँकेत खाते काढून आधार क्रमांक देवून या बिमा योजनेत सहभागी होता येणार आहे़ (प्रतिनिधी)भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जीवनज्योत बीमा योजना, अटल पेन्शन विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या तीन योजना ९ मे रोजी सुरू केल्या आहेत़ यामध्ये सर्वसामान्याला किफायतशीर व लाभदायक असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या मोहिमेअंतर्गत वार्षिक प्रिमीयम फक्त १२ रूपये व त्या माध्यमातून मिळणारे लाभ सर्वसामान्यांसाठी लाभदायक व मोठ्या प्रमाणात असल्याने या विमा योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या योजनेअंतर्गत आठ दिवसांत ४१ हजार ५९५ नागरिकांनी बँकेत खाते उघडले आहेत.