शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

महावितरणला ‘सौभाग्य’चे वावडे; घोषणा केली ६४ हजारांची; कनेक्शन दिले केवळ एक हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:00 IST

आठ महिन्यांमध्ये महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाने निश्चित केलेल्या ६४ हजार ५३० कुटुंबांपैकी अवघ्या १ हजार कुटुंबांच्याच घरापर्यंत वीज पोहोचू शकली.

ठळक मुद्दे दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली. दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली.

- विजय सरवदे  

औरंगाबाद : गरिबांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य योजना’ आणली खरी; पण गेल्या आठ महिन्यांमध्ये महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाने निश्चित केलेल्या ६४ हजार ५३० कुटुंबांपैकी अवघ्या १ हजार कुटुंबांच्याच घरापर्यंत वीज पोहोचू शकली. यामुळे गरिबांना वीज देण्याची महावितरणची घोषणा पोकळ ठरली आहे. 

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीज आणि दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली. तत्पूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या घरी अद्यापपर्यंतही वीज पोहोचलेली नाही, अशा दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील दोन्ही कुटुंबांचे सर्वेक्षण सहायक व शाखा अभियंत्यांमार्फत करण्यात आले. यामध्ये दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली.

यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील १ हजार ४६१ कुटुंबांपैकी आतापर्यंत अवघ्या ७० कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात आले, तर दारिद्र्य रेषेवरील निश्चित करण्यात आलेल्या २६ हजार ७२८ कुटुंबांपैकी आतापर्यंत ६८० कुटुंबांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेखालील ९ हजार १०३ कुटुंबांपैकी आतापर्यंत २५० कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात महावितरणला यश आले आहे. या जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्य रेषेवरील २७ हजार २३८ कुटुंबांपैकी एकालाही कनेक्शन देण्यात आलेले नाही. 

योजनेसाठी वीज बिलाच्या थकबाकीमुळे ज्यांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, तात्पुरत्या शिबिरातील स्थलांतरित होऊ शकणारी कुटुंबे तसेच शेतवस्त्यांवरील घरे ही पात्र राहणार नाहीत. या योजनेच्या लाभार्थ्यांना वीज जोडणीच्या वेळी मीटरसोबत घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येणार आहे. अतिदुर्गम भागात ज्याठिकाणी विजेचे कनेक्शन देणे शक्य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी बल्ब आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनांच्या घरांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीज जोडणी, तर दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये वीज जोडणी दिली जाणार आहे. या लाभार्थ्यांना ही रक्कम रोख स्वरुपात न भरता वीज बिलासोबत सलग दहा टप्प्यांमध्ये ती भरण्याची सवलत देण्यात आली आहे.

‘डेडलाईन’ आॅगस्ट २०१८यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, आठ महिन्यांत कामामध्ये संथगती होती; पण यापुढे वीज कनेक्शन देण्यासाठी गती घेतली जाईल. कंत्राटदारांसोबत महावितरणचे कर्मचारीही वीज कनेक्शन देण्यासाठी जुंपले जातील. सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आलेल्या या योजनेची ‘डेडलाईन’ ही आॅगस्ट २०१८ आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणgovernment schemeसरकारी योजनाelectricityवीज