शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

‘समृद्धी’साठी हेक्टरी ६४ लाख !

By admin | Updated: June 18, 2017 00:47 IST

जालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने कोरडवाहू, हंगामी बागायती व बागायती जमिनीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार १७ गावांतील शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी २५ ते ६४ लाख रुपये मोबदला मिळणार आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून ४२ किलोमीटरवरून समृद्धी महामार्ग जाणार असून, त्यासाठी ५१२.२८ हेक्टर जमिनींचे संपादन होणार आहे. पैकी ५०१.११ हेक्टर जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लँड पुलिंग मॉडेलला होणारा विरोध पाहता शासनाने आता थेट वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय मोबदला निश्चिती समितीने जमिनीच्या महसूल आकारणीनुसार चार वेगवेगळे भाग पाडले आहेत. जिरायती, हंगामी बागायती व बागायती जमिनीच्या पायाभूत दरांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या गावांमधील जमीन संपादित होणार आहे, तेथील तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांच्या सरासरी पाचपट दर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. समितीने ठरविलेल्या दरास संमती असणाऱ्या शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील संमतीपत्र तलाठी, उपविभागीय अधिकारी किंवा संवादकांमार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयात जमा करता येणार आहेत.