शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘समृद्धी’साठी हेक्टरी ६४ लाख !

By admin | Updated: June 18, 2017 00:47 IST

जालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने कोरडवाहू, हंगामी बागायती व बागायती जमिनीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार १७ गावांतील शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी २५ ते ६४ लाख रुपये मोबदला मिळणार आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून ४२ किलोमीटरवरून समृद्धी महामार्ग जाणार असून, त्यासाठी ५१२.२८ हेक्टर जमिनींचे संपादन होणार आहे. पैकी ५०१.११ हेक्टर जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लँड पुलिंग मॉडेलला होणारा विरोध पाहता शासनाने आता थेट वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय मोबदला निश्चिती समितीने जमिनीच्या महसूल आकारणीनुसार चार वेगवेगळे भाग पाडले आहेत. जिरायती, हंगामी बागायती व बागायती जमिनीच्या पायाभूत दरांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या गावांमधील जमीन संपादित होणार आहे, तेथील तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांच्या सरासरी पाचपट दर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. समितीने ठरविलेल्या दरास संमती असणाऱ्या शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील संमतीपत्र तलाठी, उपविभागीय अधिकारी किंवा संवादकांमार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयात जमा करता येणार आहेत.