शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

जायकवाडीत ६३.४% पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:11 IST

जायकवाडी धरणात येणारी आवक कालपासून घटत असून, बुधवारी सायंकाळी धरणात १३३३३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. दरम्यान, धरणाचा जलसाठा ६३.०४% एवढा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून, यामुळे धरणात येणारी आवक कालपासून घटत असून, बुधवारी (दि.२३) सायंकाळी धरणात १३३३३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. दरम्यान, धरणाचा जलसाठा ६३.०४% एवढा झाला होता.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या नाथसागराची पाणीपातळी १५१४.५६ फुटांपर्यंत गेली असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ७.५ (साडेसात) फूट पाणी लागणार आहे. धरणात एकूण जलसाठा २१०६.८२६ दलघमी, तर उपयुक्त जलसाठा १३६८.७२० दलघमी एवढा झाला आहे. मोठ्या पावसाचे दिवस अद्याप बाकी असल्याने यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा जायकवाडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.