शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

रोजगाराच्या शोधात ६० टक्के गाव झाले रिकामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:41 IST

तब्बल ६० टक्के ग्रामस्थ रोजगाराच्या शोधात बाहेर पडल्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गंगापूर तालुक्यातील बोलठाण हे गाव ओस पडले आहे.

- लालखाँ पठाणगंगापूर (जि. औरंगाबाद) : तब्बल ६० टक्के ग्रामस्थ रोजगाराच्या शोधात बाहेर पडल्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गंगापूर तालुक्यातील बोलठाण हे गाव ओस पडले आहे. काम करू शकणार नाहीत, असे वृद्ध तेवढेच गावात शिल्लक आहेत. १०० घरांचे आणि ७०० ते ८०० लोकसंख्येचे हे गाव. गावात सर्वच शेतकरी अल्पभूधारक आहेत. पाऊस पडतो आणि वाहून जातो. निचरा होणारी जमीन नसल्याने पाणी मुरत नाही. त्यामुळे पाणीपातळी खोलवर गेली आहे. नऊ एकराचे धनी असलेले रामनाथ पवार म्हणाले की, ‘पाऊस नसल्यामुळे खरीप पीक हातचे गेले. एकरी २० क्ंिवटल बाजरी होत असे. आता किती किलो होईल हे सांगता येत नाही. अजून एक वर्षाचा कालावधी लोटायचा आहे. हा काळ कसा जाणार ते देवालाच ठाऊक.’अकरा वर्षांपूर्वी याठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले. या योजनेचा काहीच फायदा झाला नाही. परिसरात काही विहिरींना थोडेफार पाणी आहे. त्यावर नागरिकांची व जनावरांची तहान भागत आहे. ते किती दिवस पुरेल ठाऊक नाही. गावापासून ४ किलोमीटर अंतरावर शिवना नदी वाहते. तीही कोरडी आहे. पावसाळा असतानाच ही स्थिती. उन्हाळ्यात काय होईल, हा प्रश्न आहे. पिण्यासाठी पाणी नाही. पिकांना पाणी नाही. जनावरे कसे सांभाळणार म्हणून अनेकांनी जनावरे विकून टाकली. शेतात काम नाही आणि पीकही शिल्लक राहिले नाही. रेशनचे धान्य व टँकरचे पाणी यावरच उदरनिर्वाह होत असल्याचे कदीर गफूर शेख यांनी सांगितले.>७२ गावांना ७७ टँकरगंगापूर तालुक्यात आॅक्टोबरमध्येच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ७२ गावांसाठी ७७ टँकर आताच सुरू असून, दररोज १५४ खेपांच्या माध्यमातून गावकºयांची तहान भागविली जात आहे.नुकसान भरून येणे अशक्यखरिपाचे नुकसान भरून येणे शक्य नाही. आता पाऊस झाला तरीही रबीत गव्हासारखे पीक येणे अशक्य आहे.- व्यंकट ठक्के (कृषी अधिकारी, गंगापूर)