शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागात ६० लाखांची बोगस बिले?

By admin | Updated: June 1, 2016 00:15 IST

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ६० लाख रुपयांची बिले बोगस असल्याच्या संशयावरून त्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ६० लाख रुपयांची बिले बोगस असल्याच्या संशयावरून त्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला ८८ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने परत पाठविल्यानंतर ६० लाखांचे देणे २ वर्षांपासून थकीत असल्याची माहिती समोर येण्यामागे मोठे गौडबंगाल असल्याचे दिसते. २ वर्षांपासून ६० लाख रुपयांची बिले मागण्यासाठी एकही कंत्राटदार, पुरवठादार समोर आलेला नाही. त्यामुळे ६० लाख रुपयांचे देणे हे कागदावरच आहे की खरोखर देणे आहे. याची चौकशी खरंच होणार काय, असा प्रश्न आहे.२०१४ मध्ये लोकसभेची तर विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर २०१४ मध्ये झाली. लोकसभा निवडणुकीचा खर्च १२ कोटींच्या तर विधानसभेचा खर्च १५ कोटींच्या आसपास पोहोचला. ही रक्कम केंद्र आणि राज्य आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळत राहिली. २०१५ मध्ये प्राप्त झालेले ५३ लाख आणि २०१६ मध्ये मिळालेले ३५ लाख असा ८८ लाखांचा निधी ३१ मार्चला निवडणूक आयोगाकडे परत पाठविण्यात आला आहे. जुन्या ६० लाख रुपयांच्या बिलांमध्ये प्रिंटिंग, व्हिडिओ शूटिंग, फर्निचर, मंडप, चहा, नाश्ता, भोजनासह इतर बिलांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक खर्च बिलांवर स्वाक्षरी न करताच ते परत निवडणूक विभागाकडे पाठविले. तत्कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या बिलांवर प्रलंबित असल्याचा शेरा मारला. निवडणूक आयोगाकडून प्रलंबित बिले देण्यासाठी २ वर्षांत ८८ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी हा निधी खर्च न करताच परत गेल्यानंतर ६० लाखांची देयके आले कुठून असा प्रश्न आहे. निवडणूक विभागाकडे गेल्या २ वर्षांपासून ६० लाखांची बिले प्रलंबित आहेत; परंतु ही बिले मागण्यासाठी एकही कंत्राटदार उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर झाला नाही. त्यामुळे या बिलांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. ४बिले सादर केल्यानंतर कंत्राटदार पेमेंट घेण्यासाठी अधिकाऱ्यांची पाठ सोडत नाहीत, तर दुसरीकडे २ वर्षांत दोनदा निधी येऊनही तो परत गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ४या बिलांची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.