लातूर : महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम गतीमान केली आहे़ आयुक्तांनी ठरवून दिलेल्या मार्गानुसार अतिक्रमण काढण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून जोरदार सुरू आहे़ गुरूवारी शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक मार्गावरील औसा रोडवर असलेले ६० अतिक्रमणे काढण्यात आली आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाने आखणी करून दिलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात येत आहेत़ लातूर शहर महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आठ दिवसांपासून मोहीम हाती घेतली आहे़ या मोहिमेंतर्गत १७ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत़ त्यानुसार मनपा प्रशासन कारवाई मोहीम राबवित आहे़ गुरूवारी सकाळी शिवाजी चौकातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून पुढे राजीव गांधी चौकापर्यंत रस्त्यावर मांडण्यात आलेली ५७ ते ६० अतिक्रमणे काढण्यात आली आहेत़ शुक्रवारी राजीव गांधी चौकापासून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत़ दरम्यान, अतिक्रमण काढण्यात आल्याने मुख्य मार्गावरील रस्ते रूंदावले आहेत़ प्रशासनाने अतिक्रमण काढायला सुरूवात केली असली तरी बहुतांश ठिकाणी पुढे अतिक्रमण काढले की, लागलीच त्या जागांवर अतिक्रमण होत आहे़ बार्शी रोडवरील फुटपाथवरील दुकाने काढताच पुन्हा बसली़ शिवाय, उषाकिरण पेट्रोलपंपासमोरील बार्शी रोडकडे जाणाऱ्या फुटपाथवर वडापाव विक्रेत्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे़ (प्रतिनिधी)मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे मुख्य मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली आहे़ मुख्य मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पांढरा पट्टा मारून जागेची आखणी केली जात आहेत़ आखणी केलेल्या जागेवरील अतिक्रमण काढताना दुजाभाव केला जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे़ मुख्य रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोर असलेल्या शासकीय कार्यालयाची संरक्षण भिंत जवळपास ५ फुट आखणीत येते़ तसेच उड्डाणपुलागत असलेल्या काही वजनदार लोकांच्या जागेवर अतिक्रमण विभागाचा हातोडा बसला नाही़
औसा रोडवरील ६० अतिक्रमणे हटविली
By admin | Updated: January 9, 2015 00:50 IST