शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महिन्याचे काम ६ हजारात, तर मोबदला १२ हजार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:02 IST

-- औरंगाबाद ःजिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींत संगणक परिचालक नेमले गेले आहेत. त्या परिचालकांना ६ हजार रुपये मानधन संबंधित ...

--

औरंगाबाद ःजिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींत संगणक परिचालक नेमले गेले आहेत. त्या परिचालकांना ६ हजार रुपये मानधन संबंधित कंपनी देते. तर १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून ही कंपनी या कामाचे १२ हजार रुपये उकळते. ही सरळसरळ लूट सुरू असून, ती थांबवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. महिन्याचे काम ६ हजारात होत असताना मोबदला १२ हजार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आपले सरकारकडून ग्रामपंचायतींची दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी केला. तर माजी उपाध्यक्ष व जि. प. सदस्य केशव तायडे यांनीही कर्मचाऱ्याला वेतना व्यतिरिक्त लागणारा दुप्पट पैसा कंपनीला देण्यापेक्षा हे काम ग्रामपंचायतीकडे दिल्यास अनुदानाची बचत होऊन त्यावर स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा, सदस्यांचा वचक राहील, असे सांगितले. स्थायी समितीच्या बैठकीत यावर झालेल्या चर्चेत मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही भूमिका मांडण्यात आली नाही. तर ही लूट थांबवा, थेट निधी वळता करू नका, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली आहे. अर्थ समिती सभापती किशोर बलांडे यांनीही हा प्रकार गंभीर असून, नियमित दुप्पट मोबदला घेऊन त्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मोबदला दिला जात नसल्याने ग्रामपंचायतींच्या कामावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.

---

७०२ सेंटरच्या माध्यमातून सेवा

---

आपले सरकार सेवा केंद्र जिल्ह्यात ७०२ सेंटरच्या माध्यमातून सेवा देते. ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने, कॅशबुक, क्लोजींगसह अनेक कामे करते. परिचालकांना ६ हजार मानधन नियमित दिले जाते. वर्षाकाठी एक ग्रामपंचायतीकडून १ लाख ४२ हजार ९७२ रुपये घेतले जातात. पूर्वी २०१३ पासून संग्राम प्रकल्प होता, त्यातीलच जुने ऑपरेटर २०१६ ला आपले सरकारमध्ये घेतल्या गेले आहेत. ग्रामपंचायतींकडून १० कोटी ६९ लाख रुपये येणे बाकी होते. त्यापैकी केवळ ६ कोटीच आतापर्यंत मिळाले. तरीही डिसेंबरपर्यंतचे वेतन नियमित करण्यात आले आहे, असे जिल्हा समन्वयक विजय सावंत यांनी सांगितले.