शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

५९० दात्यांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:50 IST

वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत आहे. शिवाय आधुनिकतेमुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळत आहे. जिल्हा रूग्णालयातर्फे गतवर्षांपासून महाअवयवदान अभियान राबविले जात असून आतापर्यंत ५९० जणांनी अवयवदान तर ७९० दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. २४ दात्यांचे नेत्र प्रत्यारोपण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत आहे. शिवाय आधुनिकतेमुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळत आहे. जिल्हा रूग्णालयातर्फे गतवर्षांपासून महाअवयवदान अभियान राबविले जात असून आतापर्यंत ५९० जणांनी अवयवदान तर ७९० दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. २४ दात्यांचे नेत्र प्रत्यारोपण केले आहे.जिवंत अथवा मृत झाल्यानंतर मानवी शरीरातील अवयव दुसºया व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मृत्यूनंतर प्रत्येकजन अवयव दान करू शकतो. अंतिम टप्प्यातील ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण अवयवदानामुळे वाचवता येतात. ज्या रुग्णाचे अवयव कायम निकामी झाले त्यांच्यासमोर एकमेव अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. त्यामुळे प्रत्येकांनी सर्वश्रेष्ठदान महाअवयव दान करण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे केले जात आहे. शिवाय २९ ते ३० आॅगस्ट दरम्यान, जिल्हाभरात महाअवयव व नेत्रदान अभियान राबविले जात आहे. शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना अवयव व नेत्रदानाविषयी माहिती सांगून जनजागृतीचा संदेश पोहोचविण्याचे काम रूग्णालयाची टीम करीत आहे. ‘जीते जीते रक्तदान, जाते जाते अवयवदान, और जाने के बाद नेत्र और देहदान’ या ब्रीद वाक्यानुसार सध्या महाअभियान राबविले जात असून दात्यांचे अर्ज भरून घेतले जात असल्याचे समुपदेशक सुविधा खिल्लारे यांनी सांगितले.अवयव व नेत्रदानाविषयी माहिती दिली जात असून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.