शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

५८ टक्के पेरणी

By admin | Updated: July 24, 2014 00:29 IST

हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीस मागील आठवड्यापासून प्रारंभ झाला आहे.

हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीस मागील आठवड्यापासून प्रारंभ झाला आहे. यंदा अधिकच उशीर झाल्याने सरसगट शेतकरी जोमाने पेरणीला लागल्यामुळे २२ जुलैपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५६ टक्के पेरणी आटोपली आहे. प्रामुख्याने त्यात कापसाला नाकारून बळीराजाने अपेक्षेनुरूप सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. आगामी चार दिवसांत पावसाने उघाड दिल्यास आठवडाभरात पेरण्या पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन होते; परंतु उशिरा मान्सून दाखल झाल्याने उत्पादकांचे आणि कृषी विभागाचे गणित बिघडले. गतवर्षी २२ जुनपर्यंत पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा अगदी उलट स्थिती असल्याने पन्नास टक्के क्षेत्रावर देखील पेरण्या झालेल्या नाहीत. मुख्यत्वेकरून यंदा कृषी विभागाने निश्चित केलेल्या क्षेत्रापेक्षाही कापसाचे क्षेत्र अधिक घसरण्याची चिन्हे आहेत. इतर पिकांच्या तुलनेने लवकर लागवड होणाऱ्या कापसाला नाकारल्याने पेरणीस विलंब होत आहे. आजघडीला ९४ हजार पैकी ५६ हजार ९८४ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सद्य:स्थितीत २८ पैकी ८ हजार ९३१ हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला असला तरी तुरीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पेरणीला विलंब झाल्याने मूग आणि उडदाऐवजी तूर घेण्याकडे उत्पादकांचा कल वाढला आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात चारा समस्येने पशुपालक हैराण असताना खरीप ज्वारीचा पेरा कमी आहे. एकूण ४४ हजार ८९० पैकी ६ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. बाजरी, मका, भूईमुग, तीळ, काराळ, सुर्यफुल ही पिके हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. ही सर्व पिके मिळून ३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी ठरविले होते. प्र्रामुख्याने निश्चित केलेल्या ६६० पेक्षा तिप्पटीने म्हणजे १ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे; पण तीळ, काराळ आणि सूर्यफूल मिळून २०० हेक्टर क्षेत्रावरही देखील पेरणी झालेली नाही. भाताच्या बाबतीतही कृषी विभागाचे नियोजन चुकल्याने २ हजार २४० पैकी अत्यंत नगण्य क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. हळदीची ६ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अटोपली आहे. सुरूवातीला कृषी विभागाने १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाचे आणि १६ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी होण्याची शक्यता वर्तविली होती; परंतु पाऊस महिनाभराच्या उशिराने दाखल झाल्याने यो दोन्ही पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला. परिणामी उत्पादकांनी मुगाची २ हजार ६२५ तर उडदाची २ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. वरील सर्व पिकांची गोळाबेरीज केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढणार हे निश्चित असताना अपेक्षेपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. यंदा नियोजित २ लाख पैकी १ लाख ४ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विशेषत: सर्वच तालुक्यात सोयाबीनचा पेरा होत असून कापसाबरोबर तृणधान्याच्या कमी होत जाणाऱ्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होत आहे. शिवाय सोयाबीन वगळता गळीत धान्यातील सर्व पिकांचे कमी झालेले क्षेत्र सोयाबीनकडे वळले आहेत. आगामी चार दिवसांत उघडीप दिल्यास आठवड्यात पेरण्या आटोपण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) अशी घ्या खबरदारी...पुरेशा ओलीवर पेरणी करावी, प्रामुख्याने सोयाबीनचे बियाणे खोलावर जावू नये, याची काळजी घ्यावी, उगवणशक्ती तपासलेले सोयाबीनचे बियाणे पेरावे, पेरणीला उशीर झाल्यामुळे अंतरपिके अधिक घ्यावीत, पाऊसमान कमी असल्यामुळे रूंद सरी वरंब्या पद्धतीने पेरणी करावी, मूग आणि उडदाचे पीक शक्यतो घेवू नयेत, शिफारशीपेक्षा २५ ते ३० टक्के खत कमी वापरावा, कमी ओलावा असल्यामुळे जमिनीतील पाणी अधिक शोषून घेत असलेले तण लवकर काढावे असा सल्ला कळमनुरी तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी दिला आहे.जिल्ह्यात यंदा ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पेरणीचे केले आहे नियोजन. सरसगट शेतकरी जोमाने पेरणीला लागल्यामुळे २२ जुलैपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात झाली ५६ टक्के पेरणी.जिल्ह्यात इतर पिकांपेक्षा सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे १ लाख हेक्टर क्षेत्रावर.