शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

५८ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये थकित बिलाची माफी

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी

लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपयांची थकबाकी भरली असून, या शेतकऱ्यांना एकूण रकमेपैकी ५८ लाख ३० लाख ४६ हजार रुपये माफ करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार मिळाला आहे़कृषी पंपावरील वीज बिलांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ेंथकबाकीदारांसाठी मुळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यामध्ये भरण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे़ तर उरलेली रक्कम महाराष्ट्र शासनाच्या वतीने महावितरण विद्युत कायदा २००३ कलम ६५ प्रमाणे रोखीने आणि समप्रमाणात अनुदान स्वरूपात अदा करण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे थकीत व्याज व दंडही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़कृषी ग्राहकांसाठी १ एप्रिल २०१४ पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करून हा कालावधी मार्च २०१५ पर्यंत करण्यात आला आहे़ लातूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी मार्च २०१४ च्या मुळ थकबाकीच्या प्रमाणात एकूण रकमेपैकी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपये मुळ थकबाकी, दंडाची रक्कम व व्याजाच्या रकमेचा भरणा केला असून, यामधून ५८ कोटी ३० लाख ४६ हजार रूपयांची माफी करण्यात आली आहे़ तसेच १ कोटी ५० लाख रूपयाची गारपीट व टंचाई माफी करण्यात आली आहे़ या रकमेचाही यात समावेश करण्यात आलेला आहे़ महावितरणच्या या अभिनव योजनेमुळे कृषीपंपाच्या ग्राहकांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोठा आधार मिळाला आहे़ (प्रतिनिधी)कृषी ग्राहकांवरील कृषी संजीवनी योजनेअंतर्गत थकी वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्याचा राहिलेल्या ग्राहकांमध्ये ३ लाख ६३ हजार जणांचा समावेश आहे़ या ग्राहकांनी ४०१ कोटी रक्कमेचा भरणा केल्यास त्यांची ११५५ कोटी ५२ लाख ७७ हजार १९४ रूपये एवढी माफी होणार आहे़ ग्राहकांना या योजनेचा लाभ मार्चअखेरपर्यंत घेता येणार आहे. कंपनीने मुदतवाढ दिल्यामुळे अन्य शेतकऱ्यांनाही याचा फायदा घेता येणार आहे.