शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

५८ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये थकित बिलाची माफी

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी

लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपयांची थकबाकी भरली असून, या शेतकऱ्यांना एकूण रकमेपैकी ५८ लाख ३० लाख ४६ हजार रुपये माफ करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार मिळाला आहे़कृषी पंपावरील वीज बिलांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ेंथकबाकीदारांसाठी मुळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यामध्ये भरण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे़ तर उरलेली रक्कम महाराष्ट्र शासनाच्या वतीने महावितरण विद्युत कायदा २००३ कलम ६५ प्रमाणे रोखीने आणि समप्रमाणात अनुदान स्वरूपात अदा करण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे थकीत व्याज व दंडही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़कृषी ग्राहकांसाठी १ एप्रिल २०१४ पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करून हा कालावधी मार्च २०१५ पर्यंत करण्यात आला आहे़ लातूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी मार्च २०१४ च्या मुळ थकबाकीच्या प्रमाणात एकूण रकमेपैकी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपये मुळ थकबाकी, दंडाची रक्कम व व्याजाच्या रकमेचा भरणा केला असून, यामधून ५८ कोटी ३० लाख ४६ हजार रूपयांची माफी करण्यात आली आहे़ तसेच १ कोटी ५० लाख रूपयाची गारपीट व टंचाई माफी करण्यात आली आहे़ या रकमेचाही यात समावेश करण्यात आलेला आहे़ महावितरणच्या या अभिनव योजनेमुळे कृषीपंपाच्या ग्राहकांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोठा आधार मिळाला आहे़ (प्रतिनिधी)कृषी ग्राहकांवरील कृषी संजीवनी योजनेअंतर्गत थकी वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्याचा राहिलेल्या ग्राहकांमध्ये ३ लाख ६३ हजार जणांचा समावेश आहे़ या ग्राहकांनी ४०१ कोटी रक्कमेचा भरणा केल्यास त्यांची ११५५ कोटी ५२ लाख ७७ हजार १९४ रूपये एवढी माफी होणार आहे़ ग्राहकांना या योजनेचा लाभ मार्चअखेरपर्यंत घेता येणार आहे. कंपनीने मुदतवाढ दिल्यामुळे अन्य शेतकऱ्यांनाही याचा फायदा घेता येणार आहे.