शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

५७७ ग्रामपंचायतीत स्वच्छतेची गुढी

By admin | Updated: March 29, 2017 00:14 IST

उस्मानाबाद : ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा निरधार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे.

उस्मानाबाद : ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा निरधार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाभरातील सुमारे ५७७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची गुढी उभारून गाव पाणंदमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. साधारणपणे तीन-चार वर्षांपूर्वी जिल्हा स्वच्छ भारत अभियानात ‘टॉपटेन’मध्ये होता. वैैयक्तिक शौचालाचे प्रमाण झपाट्याने वाढत होते. परंतु, मध्यंतरीच्या काही महिन्यात शौचालये बांधूनही लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागले. या प्रकारामुळे मागील पाच ते सहा महिन्यात स्वच्छ भारत अभियानचे काम अक्षरश: ढेपाळले. टॉपटेनमध्ये असलेला जिल्हा तळाला गेला. हे चित्र बदलण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी लक्ष घालून अभियानला पुन्हा गती देण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलली आहेत. ‘स्वच्छतेची गुढी’ हा याचाच एक भाग आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची गुढी उभारून ३० सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत गाव पाणंदमुक्त करण्याची शपथ घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळीच जिल्हाभरातील लोहारा तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसमोर स्वच्छतेची गुढी उभारण्यात आली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांनी एकत्र येत स्वच्छतेची शपथ घेतली. सप्टेंबर अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत गाव पाणंदमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी केला.(प्रतिनिधी)