शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

५४ रेशन दुकानदारांची अनामत केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:08 IST

ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे.परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करण्याची प्रक्रिया मे महिन्यापासून सुरु झाली आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार १८७ परवानाधारक स्वस्तधान्य दुकानदार असून या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाने ई-पॉस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील गोर-गरीब लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या हक्काचे धान्य पोहचावे, या उद्देशाने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करताना संबंधित लाभार्थी कुटुंबातील एका सदस्याचा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे. हा ठसा घेतल्यानंतर मशीनवर कुटुंबाला मिळणारे एकूण धान्य, त्याची किंमत आदी माहिती उपलब्ध होते आणि धान्य वितरित झाल्यानंतर ही माहिती संकेतस्थळावर आॅनलाईन भरली जाते. या पद्धतीमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच धान्य मिळणार आहे. तसेच धान्याचा काळा बाजार थांबणार आहे. जिल्ह्यात ३० मे २०१७ रोजी सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात सर्व दुकानदारांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना मशीन हाताळण्याची माहिती तांत्रिक अधिकाºयांमार्फत देण्यात आली. तसेच ई-पॉस मशीनचे लिंकही करुन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराने मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे अपेक्षित आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याला मिळालेल्या धान्याचा कोटा लाभार्थ्यांना वितरित झाला आहे. हा संपूर्ण कोटा उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनच्या सहाय्याने किती जणांनी धान्याचे वितरण केले, याची माहिती घेतली. यात काही दुकानदारांनी या मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करण्यास टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात ५४ दुकानदारांनी आॅगस्ट महिन्यात या मशीनवर किमान दहा ट्रान्झेंक्शन केले नाही, अशी माहिती समोर आली. सर्व धान्य ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच वितरित करणे आवश्यक असताना या कामात कसूर केल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी एका आदेशानुसार हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रेशनदुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून आता या दुकानदारांना ई-पॉस मशीनचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही.