शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

५४ रेशन दुकानदारांची अनामत केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:08 IST

ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे.परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करण्याची प्रक्रिया मे महिन्यापासून सुरु झाली आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार १८७ परवानाधारक स्वस्तधान्य दुकानदार असून या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाने ई-पॉस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील गोर-गरीब लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या हक्काचे धान्य पोहचावे, या उद्देशाने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करताना संबंधित लाभार्थी कुटुंबातील एका सदस्याचा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे. हा ठसा घेतल्यानंतर मशीनवर कुटुंबाला मिळणारे एकूण धान्य, त्याची किंमत आदी माहिती उपलब्ध होते आणि धान्य वितरित झाल्यानंतर ही माहिती संकेतस्थळावर आॅनलाईन भरली जाते. या पद्धतीमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच धान्य मिळणार आहे. तसेच धान्याचा काळा बाजार थांबणार आहे. जिल्ह्यात ३० मे २०१७ रोजी सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात सर्व दुकानदारांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना मशीन हाताळण्याची माहिती तांत्रिक अधिकाºयांमार्फत देण्यात आली. तसेच ई-पॉस मशीनचे लिंकही करुन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराने मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे अपेक्षित आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याला मिळालेल्या धान्याचा कोटा लाभार्थ्यांना वितरित झाला आहे. हा संपूर्ण कोटा उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनच्या सहाय्याने किती जणांनी धान्याचे वितरण केले, याची माहिती घेतली. यात काही दुकानदारांनी या मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करण्यास टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात ५४ दुकानदारांनी आॅगस्ट महिन्यात या मशीनवर किमान दहा ट्रान्झेंक्शन केले नाही, अशी माहिती समोर आली. सर्व धान्य ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच वितरित करणे आवश्यक असताना या कामात कसूर केल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी एका आदेशानुसार हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रेशनदुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून आता या दुकानदारांना ई-पॉस मशीनचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही.