शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

७०० भाविकांची ५१ कुंडी यज्ञात आहुती

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

औरंगाबाद : वेदमंत्रोच्चारात ७०० भाविकांनी ५१ कुंडी यज्ञात आहुती अर्पण केली. विविध औषधी वनस्पतींचा वापर आहुतीत करण्यात आला होता. यामुळे वातावरण मंगलमय बनले होते.

औरंगाबाद : वेदमंत्रोच्चारात ७०० भाविकांनी ५१ कुंडी यज्ञात आहुती अर्पण केली. विविध औषधी वनस्पतींचा वापर आहुतीत करण्यात आला होता. यामुळे वातावरण मंगलमय बनले होते. यज्ञ सोहळा पाहून आत्मशांती मिळाल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या. हेच या आयोजनाचे फलित होय. गायत्री परिवाराच्या वतीने स्टेशन रोडवरील टकसाळी मंगल कार्यालयात चारदिवसीय गायत्री महायज्ञ व संस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे शेकडो भाविक यज्ञस्थळी जमले होते. ६.३० वाजता समूह साधनेला सुरुवात झाली. यासंदर्भात गायत्री विद्यापीठाचे प्राचार्य कैलास महाजन यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने सामूहिक साधना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यावेळी सामूहिकरीत्या ‘गायत्री मंत्र’ म्हणण्यात आले. सकाळी ७.३० वाजता गायत्री महायज्ञाला सुरुवात झाली. ५१ कुंड तयार करण्यात आले होते. यावेळी वेदमंत्रोच्चारात ७०० भाविकांनी औषधी वनस्पतींची आहुती अर्पण केली. यज्ञ कर्मकांड नव्हे तर महाविज्ञान आहे, याची माहिती प्रारंभी देण्यात आली. अश्वगंधा, नागरमोथा, तेजपत्र इ. वनस्पतीची आहुती दिल्याने वातावरण प्रसन्न झाले होते. प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांनी संकल्प केला. सायंकाळी २० मिनिटांची नादयोग सामूहिक साधना करण्यात आली. त्यानंतर संगीत-प्रवचन झाले. शनिवारी सायंकाळी गायत्री दीप महायज्ञ करण्यात येणार आहे. २४ हजार दिवे यावेळी भाविक प्रज्वलित करणार असल्याची माहिती राजेश टाक यांनी दिली.