शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेचे ५१ लाख वसूल

By | Updated: December 8, 2020 04:00 IST

सिल्लोड : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत साडेआठशे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना योजनेत ७८ लाख ...

सिल्लोड : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत साडेआठशे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना योजनेत ७८ लाख ८२ हजारांचा निधी वाटप करण्यात आला होता. संबंधित शेतकरी अपात्र असल्याचे समोर आल्यानंतर महसूल विभागाने नोटीसा बजावल्यानंतर यातील ५४६ जणांनी तहसील कार्यालयाने आतापर्यंत ५१ लाख ८४ हजार रुपये जमा केले आहे. आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, केवळ रिटर्न दाखल केले आहे. आमचे उत्पन्न पाच लाखाच्या आत असल्याने आम्ही या योजनेस पात्र असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून हा निधी वाटप करण्यात आला होता. त्यात सरकारी नोकरदार, कर भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण काही शेतकऱ्यांनी हमी पत्र भरून दिल्याने नजर चुकीने शासनाकडून सिल्लोड तालुक्यातील ८५० अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ लाख ८२ हजाराचा निधी जमा झाला होता. संबंधितांना महसूल कार्यालयाने नोटीस बजावत आठ दिवसात लाभाचा रक्कम कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५४६ जणांनी ५१ लाख ८४ हजाराची रक्कम जमा केली आहे.

----- जिल्ह्यात सव्वासात हजार शेतकरी अपात्र ----

औरंगाबाद जिल्ह्यात अपात्र शेतकऱ्यांची संख्या ७ हजार २३८ असून त्यांच्या बँक खात्यावर एकूण ६ कोटी ८४ लाख १४ हजाराचा शेतकरी सन्मान निधी काही दिवसापूर्वी जमा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यात एक ३७३ शेतकऱ्यांनी एक कोटी ३० लाख ५४ हजार रुपये शासनाच्या खात्यावर जमा केले असल्याचे पुढे आले आहे.

----- तालुकानिहाय वसूल करण्यात आलेला निधी -----

औरंगाबाद १९७ शेतकऱ्यांकडून १८ लाख ८६ हजार, गंगापूर २७ शेतकरी २ लाख ६४ हजार, कन्नड ४८ शेतकरी ४ लाख ८४ हजार, खुलताबाद १६४ शेतकरी १५ लाख ९६ हजार, पैठण १४ शेतकरी एक लाख ३८ हजार, फुलंब्री १५ शेतकरी एक लाख ५० हजार, सिल्लोड ५४६ शेतकरी ५१ लाख ८४ हजार, सोयगाव २१५ शेतकरी २ लाख २ हजार, वैजापूर १४६ शेतकरी १३ लाख ७० हजार, अशा एकूण एक हजार ३७३ शेतकऱ्यांकडून एकूण एक कोटी ३० लाख ५४ हजाराची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

------- शेतकऱ्यांविरुद्ध होणार गुन्हे दाखल -----

जिल्ह्यात अजूनही ५ हजार ८६५ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ५३ लाख ६० हजाराची बाकी आहे. सिल्लोड तालुक्यात जवळपास ६५ टक्के वसुली झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अपात्र असताना निधीचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर बोजा टाकून किंवा त्या त्या पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यामुळे तत्काळ अपात्र शेतकऱ्यांनी पैसे भरावे.

- विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड.