शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेचे ५१ लाख वसूल

By | Updated: December 8, 2020 04:00 IST

सिल्लोड : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत साडेआठशे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना योजनेत ७८ लाख ...

सिल्लोड : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत साडेआठशे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना योजनेत ७८ लाख ८२ हजारांचा निधी वाटप करण्यात आला होता. संबंधित शेतकरी अपात्र असल्याचे समोर आल्यानंतर महसूल विभागाने नोटीसा बजावल्यानंतर यातील ५४६ जणांनी तहसील कार्यालयाने आतापर्यंत ५१ लाख ८४ हजार रुपये जमा केले आहे. आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, केवळ रिटर्न दाखल केले आहे. आमचे उत्पन्न पाच लाखाच्या आत असल्याने आम्ही या योजनेस पात्र असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून हा निधी वाटप करण्यात आला होता. त्यात सरकारी नोकरदार, कर भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण काही शेतकऱ्यांनी हमी पत्र भरून दिल्याने नजर चुकीने शासनाकडून सिल्लोड तालुक्यातील ८५० अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ लाख ८२ हजाराचा निधी जमा झाला होता. संबंधितांना महसूल कार्यालयाने नोटीस बजावत आठ दिवसात लाभाचा रक्कम कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५४६ जणांनी ५१ लाख ८४ हजाराची रक्कम जमा केली आहे.

----- जिल्ह्यात सव्वासात हजार शेतकरी अपात्र ----

औरंगाबाद जिल्ह्यात अपात्र शेतकऱ्यांची संख्या ७ हजार २३८ असून त्यांच्या बँक खात्यावर एकूण ६ कोटी ८४ लाख १४ हजाराचा शेतकरी सन्मान निधी काही दिवसापूर्वी जमा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यात एक ३७३ शेतकऱ्यांनी एक कोटी ३० लाख ५४ हजार रुपये शासनाच्या खात्यावर जमा केले असल्याचे पुढे आले आहे.

----- तालुकानिहाय वसूल करण्यात आलेला निधी -----

औरंगाबाद १९७ शेतकऱ्यांकडून १८ लाख ८६ हजार, गंगापूर २७ शेतकरी २ लाख ६४ हजार, कन्नड ४८ शेतकरी ४ लाख ८४ हजार, खुलताबाद १६४ शेतकरी १५ लाख ९६ हजार, पैठण १४ शेतकरी एक लाख ३८ हजार, फुलंब्री १५ शेतकरी एक लाख ५० हजार, सिल्लोड ५४६ शेतकरी ५१ लाख ८४ हजार, सोयगाव २१५ शेतकरी २ लाख २ हजार, वैजापूर १४६ शेतकरी १३ लाख ७० हजार, अशा एकूण एक हजार ३७३ शेतकऱ्यांकडून एकूण एक कोटी ३० लाख ५४ हजाराची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

------- शेतकऱ्यांविरुद्ध होणार गुन्हे दाखल -----

जिल्ह्यात अजूनही ५ हजार ८६५ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ५३ लाख ६० हजाराची बाकी आहे. सिल्लोड तालुक्यात जवळपास ६५ टक्के वसुली झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अपात्र असताना निधीचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर बोजा टाकून किंवा त्या त्या पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यामुळे तत्काळ अपात्र शेतकऱ्यांनी पैसे भरावे.

- विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड.