शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

By admin | Updated: March 20, 2017 23:49 IST

उस्मानाबाद :मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला

उस्मानाबाद : गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने मागील चार वर्षाचा दुष्काळ धुवून काढला़ जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ मात्र, मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे़अवेळी आणि अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मागील चार वर्षे जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना केला़ दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता़ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले होते़ पाण्याअभावी खरिपासह रबी हंगामातील पिकेही हातची गेल्याने आणि वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते़ अशा परिस्थितीत मागील वर्षी सप्टेंबर अखेरीस परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले़ १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ परंडा तालुक्यातील सिना-कोळेगाव, माकणी येथील निम्न तेरणा, कळंब नजीकचा मांजरा प्रकल्पासह शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे मध्यम, लघू प्रकल्प भरले होते़सलग चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर सर्वच प्रकल्प तुडूंब भरल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता़ असे असले तरी मागील पाच महिन्याच्या काळात या प्रकल्पातून तब्बल ५० टक्के पाणीउपसा करण्यात आला आहे़ सद्यस्थितीत २१९ पैकी एक प्रकल्प कोरडा पडला असून, २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ ७० प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ८६ प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे़ ४० प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के तर केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांच्यावर उपयुक्त पाणीसाठा आहे़ वाढते उन आणि होणारा पाणीउपसा यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळातही प्रकल्पातून पाण्याचा उपसा होणार आहे़ ही बाब पाहता प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर होण्याची गरज आहे़ तसे नाही झाल्यासभविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ (प्रतिनिधी)