शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

By admin | Updated: March 20, 2017 23:49 IST

उस्मानाबाद :मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला

उस्मानाबाद : गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने मागील चार वर्षाचा दुष्काळ धुवून काढला़ जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ मात्र, मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे़अवेळी आणि अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मागील चार वर्षे जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना केला़ दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता़ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले होते़ पाण्याअभावी खरिपासह रबी हंगामातील पिकेही हातची गेल्याने आणि वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते़ अशा परिस्थितीत मागील वर्षी सप्टेंबर अखेरीस परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले़ १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ परंडा तालुक्यातील सिना-कोळेगाव, माकणी येथील निम्न तेरणा, कळंब नजीकचा मांजरा प्रकल्पासह शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे मध्यम, लघू प्रकल्प भरले होते़सलग चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर सर्वच प्रकल्प तुडूंब भरल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता़ असे असले तरी मागील पाच महिन्याच्या काळात या प्रकल्पातून तब्बल ५० टक्के पाणीउपसा करण्यात आला आहे़ सद्यस्थितीत २१९ पैकी एक प्रकल्प कोरडा पडला असून, २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ ७० प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ८६ प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे़ ४० प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के तर केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांच्यावर उपयुक्त पाणीसाठा आहे़ वाढते उन आणि होणारा पाणीउपसा यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळातही प्रकल्पातून पाण्याचा उपसा होणार आहे़ ही बाब पाहता प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर होण्याची गरज आहे़ तसे नाही झाल्यासभविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ (प्रतिनिधी)