शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत ५० व्हेंटिलेटर, १०० खाटांची जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ७२ बाधित रुग्णांना भरती करून घेण्यात आले. सध्या कोरोना संदर्भातील ५९५ रुग्ण ...

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ७२ बाधित रुग्णांना भरती करून घेण्यात आले. सध्या कोरोना संदर्भातील ५९५ रुग्ण भरती असून, त्यापैकी २५१ रुग्ण सामान्य असून, २६४ रुग्ण गंभीर स्थितीतील आहेत. घाटीत असलेले १०० हून अधिक व्हेंटिलेटर रुग्णसेवेत अडकलेले असून, आणखी ५० व्हेंटिलेटरची आणि १०० खाटांची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे कागिनाळकर यांनी दिली.

घाटीतील ११७७ खाटांपैकी सध्या ५५० खाटांवर कोविड रुग्ण उपचाराची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक रुग्ण सध्या भरती होण्यासाठी येत आहेत. गंभीर नसलेले आणि ऑक्सिजन लावण्याची आवश्यकता नसलेले बाधित रुग्ण घाटीतून मेल्ट्राॅन हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी बोलणे झाले असून, त्यासंबंधी रुग्ण स्थलांतरणाचे काम पुढील दोन दिवसांत सुरू होईल. त्यामुळे गंभीर रुग्णांना घाटीत खाटांची उपलब्धता होण्यासाठी मदत होईल, असे डॉ. वर्षा रोटे कागिनाळकर म्हणाल्या. तर पुढील १० दिवस पुरेल एवढा औषध साठा असून, आवश्यक त्या मदतीची ग्वाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

---

बाधित ४८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू

घाटीतील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी असे बाधित ४८ जणांवर सध्या सुपरस्पेशालिटी विंगसह विविध वार्डांत उपचार सुरू आहेत. त्यांना मुत्रपिंड विकार विभागाच्या पहिल्या मजल्यावर हलवण्यात येणार आहे. या ठिकाणी ७४ खाटांची तर मेडिसीन इमारतीत २४ खाटा तर सर्जीकल इमारतीतही वार्ड १८ मध्ये २४ खाटा अशी शंभर खाटांची व्यवस्था पुढील दोन दिवसांत वाढली, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.

---

नाॅनकोविड रुग्णसेवा विस्कळीत होण्याची चिंता

घाटीत प्रत्यक्षात २५० खाटांची सुपरस्पेशालिटी विंग वगळता ८५० खाटांच आहेत. एमसीआयच्या नियमांसाठी घाटीत ११७७ खाटांची व्यवस्था अतिरिक्त बेड टाकून विविध वार्डांत होते; मात्र ८५० खाटांवर कोविड रुग्णसेवेसाठी राखीव केल्यावर मोजक्याच खाटा नाॅनकोविड रुग्णांसाठी उपलब्ध राहतील. त्यामुळे नाॅनकोविड रुग्णसेवेचे टर्शरी केअर सेंटरची सेवा विस्कळीत होण्याची चिंता घाटीतील तज्ज्ञ प्रशासनातून व्यक्त होत आहे.

---

५०० मनुष्यबळाची गरज

कोरोनासाठी साडेआठशे खाटांची उपलब्धता करण्यासाठी घाटीकडून ८५८ खाटांसाठी ५०० मनुष्यबळाचा ४ कोटी १० लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील तीन महिन्यांच्या व्यवस्थेसाठी दिला आहे. यापूर्वी २५० खाटांसाठी १५५ पदांचा ९७ लाखांचा तर ४५० खाटांसाठी ३५७ पदांचा २.११ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, त्यानुसार मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात ४० डॉक्टर, २०० परिचारिका, २५० चतुर्थश्रेणी कर्मचारी, २० वैद्यकीय अधिकारी, ६ वैद्यकीय जनसंपर्क अधिकारी, ६ वैद्यकीय समुपदेशक, ५ रुग्णवाहिकांसह चालक, ५ समाजसेवा अधीक्षक, २२ तंत्रज्ञ, ४ स्टेनो, २ बायोमेडिकल इंजिनीयर आदी पदांचा समावेश असल्याचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.