शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मैदानावरील ५० लाख लिटर पाण्याचा निचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:34 IST

महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागला़ परंतु पावसामुळे स्टेडीयमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागला़ परंतु पावसामुळे स्टेडीयमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे विकास कामास २०१४ मध्ये सुरूवात झाली होती़ स्टेडिमयच्या मैदानाचे विकास कामे टप्या- टप्याने करण्यात येत होते़ विकेट ब्लॉक ५, सरावासाठी विकेट ८, तुषार व पाणी निचरा व्यवस्थापनाची कामे पुर्णत्वाला आली आहेत़स्टेडियमवरील व्हीआयपी पॅव्हेलियन, अर्दन माऊंट, ३५ हजार प्रेक्षक गॅलरीचे कामे यापूर्वीच पूर्ण झाले असून क्रिकेट मैदानाचे कामही पूर्ण झाले आहे़ हैदराबाद व नागपूर येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या धर्तीवर येथील मैदानाचे काम करण्यात आले आहे़कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती़ परंतु शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने स्टेडिमयच्या मैदानावर तळे साचले़त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेल्या या मैदानाचे नुकसान झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता़ यासंदर्भात स्टेडिमय व्यवस्थापक रमेश चौरे यांनी सांगितले, मुसळधार पावसाने मैदानावर पाणी साचले असले तरी हे पाणी पूर्णत: बाहेर निघून गेले़ साधारणपणे सात ते आठ तासात मैदान कोरडे झाले़या पावसामुळे पाणी निचरा व्यवस्थापनाचे जे काम केले होते, त्याचा प्रत्यक्षात अनुभव आला़ जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा व्यवस्थीत निचरा होवून मैदान पूर्ववत झाले़मैदानाचे किंवा येथील कोणत्याही कामाचे नुकसान झाले नाही़ या स्टेडियमवर आता रणजीसह आंतराष्ट्रीय दर्जाचे एकदिवसीय व कसोटीचे क्रिकेट सामने खेळले जाऊ शकतात़