शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. निमशहरी भागाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षे राबविला जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यास पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत निमशहरी म्हणून घोषित केलेल्या गावांमध्ये मागणीनुसार पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत.जिल्ह्यात एकूण ४९ गावे ही निमशहरी म्हणून घोषित झालेली आहेत. त्यातील २२ गावे ही महानगरपालिका हद्दीलगतची आणि उर्वरित २७ गावे ही नगरपालिका हद्दीलगतची आहेत. निमशहरांची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.या ठिकाणी काही दिवसांत पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. उर्वरित ९ गावांमध्येही ग्रामपंचायतींकडून अर्ज आल्यास ही योजना राबविली जाऊ शकते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, निमशहरी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर तिथे नळांना मीटर बसविले जाणारआहेत. शिवाय या पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचे आणि विजेचे आॅडिट करण्याची संकल्पनाही अमलात येणार आहे. योजना अस्तित्वात आल्यानंतर नियमितपणे वीज आणि पाण्याच्या वापराचे एमजीपीमार्फत आॅडिट केले जाईल. नगरपालिकेलगतच्या निमशहरी ग्रामपंचायतीसिल्लोड नगरपालिका : पिंप्री, डोंगरगाव, भवन, मोढा खुर्दकन्नड नगरपालिका : अंधानेर, हिवरखेडा गौ, ब्राह्मी, गराडाखुलताबाद नगरपालिका : सराई, शूलिभंजन, खिर्डी सालुखेडापैठण नगरपालिका : कावसान, दक्षिण, उ. जायकवाडी, तांदूळवाडी, पटेगाव, दादेगाव ज., दादेगाव जुने, सायगाव, वडवाळी, वाघाडी, पंतेवाडी, तेलवाडी, चनकवाडी, वैजापूर नगरपालिका : वैजापूर ग्रा. १, वैजापूर ग्रा. २गंगापूर नगरपालिका : सिद्धपूरवाड्या-वस्त्यांनाही पाणीपुरवठाजलस्वराज्य-२ योजनेअंतर्गत पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्यात येणार आहेत. मागील पाच वर्षांपासून उन्हाळ्यात ज्या वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असेल अशा सर्व वाड्या- वस्त्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.आतापर्यंत लहान वाड्या-वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली जात नव्हती; मात्र आता या नवीन योजनेमुळे त्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. या योजनेत केवळ नगरपालिका हद्दीलगतच्या निमशहरी गावांचाच समावेश आहे. जिल्ह्यात २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाऊ शकणार आहेत; मात्र आतापर्यंत केवळ १८ गावांनीच यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केलेआहेत.