शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. निमशहरी भागाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षे राबविला जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यास पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत निमशहरी म्हणून घोषित केलेल्या गावांमध्ये मागणीनुसार पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत.जिल्ह्यात एकूण ४९ गावे ही निमशहरी म्हणून घोषित झालेली आहेत. त्यातील २२ गावे ही महानगरपालिका हद्दीलगतची आणि उर्वरित २७ गावे ही नगरपालिका हद्दीलगतची आहेत. निमशहरांची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.या ठिकाणी काही दिवसांत पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. उर्वरित ९ गावांमध्येही ग्रामपंचायतींकडून अर्ज आल्यास ही योजना राबविली जाऊ शकते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, निमशहरी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर तिथे नळांना मीटर बसविले जाणारआहेत. शिवाय या पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचे आणि विजेचे आॅडिट करण्याची संकल्पनाही अमलात येणार आहे. योजना अस्तित्वात आल्यानंतर नियमितपणे वीज आणि पाण्याच्या वापराचे एमजीपीमार्फत आॅडिट केले जाईल. नगरपालिकेलगतच्या निमशहरी ग्रामपंचायतीसिल्लोड नगरपालिका : पिंप्री, डोंगरगाव, भवन, मोढा खुर्दकन्नड नगरपालिका : अंधानेर, हिवरखेडा गौ, ब्राह्मी, गराडाखुलताबाद नगरपालिका : सराई, शूलिभंजन, खिर्डी सालुखेडापैठण नगरपालिका : कावसान, दक्षिण, उ. जायकवाडी, तांदूळवाडी, पटेगाव, दादेगाव ज., दादेगाव जुने, सायगाव, वडवाळी, वाघाडी, पंतेवाडी, तेलवाडी, चनकवाडी, वैजापूर नगरपालिका : वैजापूर ग्रा. १, वैजापूर ग्रा. २गंगापूर नगरपालिका : सिद्धपूरवाड्या-वस्त्यांनाही पाणीपुरवठाजलस्वराज्य-२ योजनेअंतर्गत पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्यात येणार आहेत. मागील पाच वर्षांपासून उन्हाळ्यात ज्या वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असेल अशा सर्व वाड्या- वस्त्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.आतापर्यंत लहान वाड्या-वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली जात नव्हती; मात्र आता या नवीन योजनेमुळे त्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. या योजनेत केवळ नगरपालिका हद्दीलगतच्या निमशहरी गावांचाच समावेश आहे. जिल्ह्यात २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाऊ शकणार आहेत; मात्र आतापर्यंत केवळ १८ गावांनीच यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केलेआहेत.