शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. निमशहरी भागाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षे राबविला जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यास पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत निमशहरी म्हणून घोषित केलेल्या गावांमध्ये मागणीनुसार पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत.जिल्ह्यात एकूण ४९ गावे ही निमशहरी म्हणून घोषित झालेली आहेत. त्यातील २२ गावे ही महानगरपालिका हद्दीलगतची आणि उर्वरित २७ गावे ही नगरपालिका हद्दीलगतची आहेत. निमशहरांची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.या ठिकाणी काही दिवसांत पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. उर्वरित ९ गावांमध्येही ग्रामपंचायतींकडून अर्ज आल्यास ही योजना राबविली जाऊ शकते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, निमशहरी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर तिथे नळांना मीटर बसविले जाणारआहेत. शिवाय या पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचे आणि विजेचे आॅडिट करण्याची संकल्पनाही अमलात येणार आहे. योजना अस्तित्वात आल्यानंतर नियमितपणे वीज आणि पाण्याच्या वापराचे एमजीपीमार्फत आॅडिट केले जाईल. नगरपालिकेलगतच्या निमशहरी ग्रामपंचायतीसिल्लोड नगरपालिका : पिंप्री, डोंगरगाव, भवन, मोढा खुर्दकन्नड नगरपालिका : अंधानेर, हिवरखेडा गौ, ब्राह्मी, गराडाखुलताबाद नगरपालिका : सराई, शूलिभंजन, खिर्डी सालुखेडापैठण नगरपालिका : कावसान, दक्षिण, उ. जायकवाडी, तांदूळवाडी, पटेगाव, दादेगाव ज., दादेगाव जुने, सायगाव, वडवाळी, वाघाडी, पंतेवाडी, तेलवाडी, चनकवाडी, वैजापूर नगरपालिका : वैजापूर ग्रा. १, वैजापूर ग्रा. २गंगापूर नगरपालिका : सिद्धपूरवाड्या-वस्त्यांनाही पाणीपुरवठाजलस्वराज्य-२ योजनेअंतर्गत पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्यात येणार आहेत. मागील पाच वर्षांपासून उन्हाळ्यात ज्या वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असेल अशा सर्व वाड्या- वस्त्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.आतापर्यंत लहान वाड्या-वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली जात नव्हती; मात्र आता या नवीन योजनेमुळे त्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. या योजनेत केवळ नगरपालिका हद्दीलगतच्या निमशहरी गावांचाच समावेश आहे. जिल्ह्यात २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाऊ शकणार आहेत; मात्र आतापर्यंत केवळ १८ गावांनीच यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केलेआहेत.