शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जेवत्या गड्याने कमविली ५ एकर ५ गुंठे शेती

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

संदीप अंकलकोटे , चाकूर तोंडावर मिसरूट फुटत असतानाच वडिलांचा आधार कोसळला़ हे दु:ख पचवित असतानाच अवघ्या दोन महिन्यात मायेचे छत्रही हरवले़ त्यामुळे पोटाची भ्रांत पडली़

संदीप अंकलकोटे , चाकूरतोंडावर मिसरूट फुटत असतानाच वडिलांचा आधार कोसळला़ हे दु:ख पचवित असतानाच अवघ्या दोन महिन्यात मायेचे छत्रही हरवले़ त्यामुळे पोटाची भ्रांत पडली़ एका शेतकऱ्याच्या शेतात दोन वेळच्या जेवणावर नोकरी पत्करून संसाराचा गाडा उभारला आणि आज ५ एकर ५ गुंठे शेती घेतल्याची कथा चाकूर तालुक्यातील घारोळा येथील शेतकरी रसुल नबीसाब शेख यांची आहे़ घारोळा येथील रसुल नबीसाब शेख यांना चार भाऊ, आई, वडील, असा परिवार होता़ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सर्वजण मोलमजुरी करत़ दोेघा भावांचे आजारात निधन झाले़ त्यानंतर काही काळ उलटताच पितृछत्र हरवले़ त्यापाठोपाठ मायेचा आधारही हरपला़ अशा परिस्थितीत त्यांनी धोंडिराम चिंते यांच्या शेतात जेवता गडी म्हणून नोकरी पत्करली़ त्यानंतर विवाह झाला़ निसर्ग नियमानुसार दोन मुले, एक मुलगी झाली़ पत्नी आणि रसुल शेख यांनी हाती पडेल ते काम करून संसाराचा गाडा उभारला़ झालेल्या कमईतून मासिक पैै पै बचत केली़ या बचतीतून १९९० मध्ये घारोळा शिवारात ३ एकर ५ गुंठे जमीन घेतली़ स्वत:ची जमीन कसण्याबरोबरच दुसरीकडे काम सुरुच ठेवले़ त्याच आधारावर पुन्हा १९९३ मध्ये २ एकर जमीन खरेदी केली़ आज त्यांच्या कुटुंबाकडे ५ एकर ५ गुंठे शेती असून, ती शेती ते स्वत: कसतात़ शेतीतील उत्पन्नातून शेख यांनी दीड लाख रूपये खर्चुन मुलीचा विवाह केला आहे़ आज त्यांचे वय ६५ असून, तेवढ्याच हिरीरीने शेतीकडे पाहतात़ एखाद्या वर्षी नापिकी झाली म्हणून काय झाले़ ती आमच्यासाठी धनच आहे, असे ते सांगतात़ शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर करीत असून, ठिबक सिंचनावर आता शेती बहरली आहे़ शेती करीत करीत त्यांनी जोड व्यवसायावरही भर दिला आहे़ त्यामुळे एखाद्या वर्षी शेतीने साथ नाही दिली तरी त्याचा आपल्या कुटुंबावर अपेक्षित परिणामी ते जाणवू देत नाहीत़