शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

अर्ध्या किलोमीटरवर ४९ खड्डे

By admin | Updated: February 1, 2015 00:45 IST

गजेंद्र देशमुख ,जालना अग्रसेन चौक ते बसस्थानक अशा साडेपाचशे मीटर रस्त्यावर तब्बल ४९ खड्डे असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आली.

गजेंद्र देशमुख ,जालनाअग्रसेन चौक ते बसस्थानक अशा साडेपाचशे मीटर रस्त्यावर तब्बल ४९ खड्डे असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आली. शहरात प्रवेश करण्याचा हा मार्ग खड्ड्यांनी आपले स्वागत करतो. जून २०१४ मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. शनिवारी या रस्त्याचा आॅन द स्पॉट पंचनामा करण्यात आला. रस्त्याची स्थिती बिकट तर आहेच पण दोन्ही बाजूंनी तब्बल लहान मोठे मिळून ४९ खड्डे आढळून आले. नव्या रस्त्याला ठिगळ लावण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यालाही मुहूर्त मिळालेला दिसत नाही. सहा महिन्यापूर्वी म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. ६८ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे हे काम आनंद कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले आहे. केवळ सहा महिन्यात रस्ता उघडा पडल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान तर आहेच शिवाय पाठ तसेच कंबरेचे विकार वाढल्याचे नागरिक पोटतिडकीने सांगतात.याविषयी नगर पालिकेचे शहर अभियंता सय्यद सऊद म्हणाले, या रस्त्याच्या कामाविषयी आनंद कन्स्ट्रक्शनला सूचना देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात या रस्त्याचे काम नव्याने सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता !४ हा रस्ता शहरात सर्वाधिक वर्दळीचा आहे. दररोज ८० ते ९० बसेस याच मार्गावरुन धावतात. त्याचबरोबर ट्रक, कार, इतर वाहने तसेच दुचाकी मिळून हजारो वाहने रस्त्यावरुन धावतात. रस्त्याचे काम मलमपट्टीसारखेच झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम अत्यंत बोगस झाले आहे. सहा महिन्यांत रस्ते धोकादायक बनले आहेत. डांबरीकरण किरकोळ झाल्याने वाहन चालविणे कठीण जात आहे. - शेख अमजद दाऊद खानसहा महिन्यांत पुन्हा नव्याने रस्ता करावा लागत आहे. हे जालनेकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कंत्राटदारांनी पुन्हा नव्याने रस्ता अथवा डागडुजी करुन करताना काळजी घ्यायला हवी. - दीपक दहेकरअग्रसेन चौकातच मोठे खड्डे आहेत. काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे. साहित्यही निकषाप्रमाणे वापरण्यात आलेले नाही. डागडुजी न झाल्यास पावसाळ्यात संपूर्ण डांबर वाहून जाणार आहे. -शेख वसिम शेख सरदारसंबंधित कंत्राटदाराने रस्त्याची डागडुजी करावी. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम झाले आहे. अवकाळी पावसामुळेही डांबर निघाले आहे. वाहनचालकांचे गैरसोय लक्षात घेता रस्ता तात्काळ दुरुस्त करावा.- शेख अफसर