शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

‘एसटी’मध्ये ४९ जण अखेर रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:02 IST

औरंगाबाद : एसटी महामंडळात दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४९ जण चालक तथा वाहकपदी रुजू झाले. कोरोनामुळे या सर्वांची नोकरी ...

औरंगाबाद : एसटी महामंडळात दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४९ जण चालक तथा वाहकपदी रुजू झाले. कोरोनामुळे या सर्वांची नोकरी लटकली होती. ‘लोकमत’ने याविषयी पाठपुरावा करताच या सर्वांचे ‘एसटी’च्या सेवेत रुजू होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले.

एसटी महामंडळाने २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदाची भरतीप्रक्रिया राबविली. औरंगाबाद विभागात २४० जागांसाठी ही भरतीप्रक्रिया झाली. परीक्षा, वैद्यकीय तपासणीतून २१९ जणांची निवड झाली. एसटी महामंडळात रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार एकावेळी ५० ते ५५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आणि नियुक्ती देण्यात आली. मात्र, ५४ जणांना प्रशिक्षण होऊनही नेमणूक मिळाली नाही. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यांची नेमणूक प्रक्रिया थांबली. वर्ष लोटूनही त्यांना नियुक्ती मिळाली. हा प्रकार ‘लोकमत’ने १३ फेब्रुवारी रोजी ‘एसटी महामंडळाचे प्रशिक्षण लटकले अन् नोकरीही अधांतरी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या वृत्तानंतर जागे झालेल्या एसटी महामंडळाने निवड झालेल्या उमेदवारांना उजळणी प्रशिक्षणासाठी बोलावले. परंतु प्रशिक्षणानंतरही नियुक्ती रेंगाळली. याविषयीदेखील ‘लोकमत’ने २६ मार्च सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने युद्धपातळीवर प्रक्रिया पूर्ण करून ८ एप्रिल रोजी ४९ जणांना नियुक्तिपत्र देऊन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याची सूचना केली. ४९ जण रुजू झाल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

‘लोकमत’मुळे अखेर रुजू

‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यामुळे एसटीत रुजू झालो. एसटी महामंडळाने शुक्रवारी नियुक्तिपत्र दिले, असे चालक तथा वाहकपदी नेमणूक मिळालेले संजय कुकलारे म्हणाले.

फोटो ओळ...

‘लोकमत’ने १३ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेले वृत्त.