शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

४७५ एसटीने सोडली अर्ध्या रस्त्यात साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळाचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. लालपरी, गोरगरिबांची जीवनवाहिनी अशीही ‘एसटी’ची ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : एसटी महामंडळाचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. लालपरी, गोरगरिबांची जीवनवाहिनी अशीही ‘एसटी’ची ओळख आहे. दररोज हजारो प्रवासी ‘एसटी’तून प्रवास करतात. परंतु अनेकदा बसच्या नादुरुस्तीमुळे प्रवाशांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होतो. गेल्या दोन वर्षांत तब्बल ४७५ एसटींनी नादुरुस्तीमुळे अर्ध्या रस्त्यातच साथ सोडली. खड्डेमय रस्ते, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, भंगार बसेसचा फटका प्रवाशांना बसत आहे.

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ५६८ बसगाड्यांचा ताफा आहे. कोरोनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. परिणामी गतवर्षी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण काहीसे कमी राहिले. दीडशे बस २०२० मध्ये नादुरुस्त झाल्या. तर २०१९ मध्ये हेच प्रमाण ३२५ इतके होते. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, बसेस लवकर खिळखिळ्या होऊन बसस्थानकातून रवाना झाल्यानंतर भर रस्त्यावर एसटी नादुरुस्त होण्याचा प्रकार होतो. एक तर बस दुरुस्त होण्याची वाट पहावी लागते अन्यथा अन्य बस येण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यातून प्रवासाचे नियोजनच विस्कळीत होते. नादुरूस्त बसच्या दुरुस्तीसाठी ब्रेक डाऊन वाहनही एसटीच्या ताफ्यात आले आहे. या वाहनामुळे कमीत कमी वेळेत बसची दुरुस्ती करणे शक्य होत आहे.

---

कोरोना काळात बस सेवा काही काळ बंद होती. त्यामुळे गतवर्षी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी राहिले. बस नादुरुस्त होण्यात जवळपास ५० टक्के घट झाली. २०१९ मध्ये ३२५ बसेस नादुरुस्त झाल्या होत्या. जुन्या बस गाड्यांचे प्रमाण विभागात अत्यल्प आहे.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

----

रस्त्यात एस.टी. बंद पडण्याची कारणे

बसस्थानकातून रवाना झाल्यानंतर रस्त्यात एसटी बंद पडण्याची अनेक कारणे आहेत. यात प्रमुख कारण टायर पंक्चर होणे आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या त्रासाला अधिक तोंड द्यावे लागते. त्याबरोबरच इंजिन जाम होणे, रेडिएटरच्या पंख्याचा बेल्ट तुटणे, सस्पेशनमधील बिघाड यासह इतर कारणांमुळे अचानक एसटी ऐन रस्त्यात बंद पडते.

----

दहा वर्षांवरील ११० बसेस

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जवळपास ११० बसगाड्या या १० वर्षांवरील आहे. आरटीओ कार्यालयाच्या नियमानुसार वाहन १५ वर्षे वापरता येते. त्यानंतर वाहनाची पुनर्रनोंदणीची प्रक्रिया करावी लागते. एसटी महामंडळ मात्र एखाद्या बसचा १२ वर्षे अथवा १२ लाख कि.मी. अंतर होईपर्यंत वापर करते. त्यानंतर ती बस स्क्रॅपमध्ये काढली जाते.

---

दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचा हिशोब नाही

प्रत्येक आगार पातळीवर देखभाल-दुरुस्तीसाठी ४० ते ४५ कर्मचारी आहेत. एखादी बस ज्या ठिकाणी नादुरुस्त होते, तेथील जवळच्या आगाराच्या माध्यमातून बसेसची देखभाल-दुरुस्ती केली जाते. महामंडळाचेच कर्मचारी हे काम करतात. त्यासाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध असते. परंतु या देखभाल-दुरुस्तीवर किती खर्च होतो, याचा हिशोब होत नसल्याची परिस्थिती आहे.

--

जिल्ह्यातील एसटी बसेस-५६८

आगारनिहाय बसची संख्या

मध्यवर्ती बसस्थानक - १४७

सिडको बसस्थानक - ९३

पैठण - ६६

सिल्लोड - ६१

वैजापूर - ५५

कन्नड - ५५

गंगापूर - ५२

सोयगाव - ३९