शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

४७५ एसटीने सोडली अर्ध्या रस्त्यात साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळाचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. लालपरी, गोरगरिबांची जीवनवाहिनी अशीही ‘एसटी’ची ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : एसटी महामंडळाचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. लालपरी, गोरगरिबांची जीवनवाहिनी अशीही ‘एसटी’ची ओळख आहे. दररोज हजारो प्रवासी ‘एसटी’तून प्रवास करतात. परंतु अनेकदा बसच्या नादुरुस्तीमुळे प्रवाशांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होतो. गेल्या दोन वर्षांत तब्बल ४७५ एसटींनी नादुरुस्तीमुळे अर्ध्या रस्त्यातच साथ सोडली. खड्डेमय रस्ते, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, भंगार बसेसचा फटका प्रवाशांना बसत आहे.

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ५६८ बसगाड्यांचा ताफा आहे. कोरोनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. परिणामी गतवर्षी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण काहीसे कमी राहिले. दीडशे बस २०२० मध्ये नादुरुस्त झाल्या. तर २०१९ मध्ये हेच प्रमाण ३२५ इतके होते. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, बसेस लवकर खिळखिळ्या होऊन बसस्थानकातून रवाना झाल्यानंतर भर रस्त्यावर एसटी नादुरुस्त होण्याचा प्रकार होतो. एक तर बस दुरुस्त होण्याची वाट पहावी लागते अन्यथा अन्य बस येण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यातून प्रवासाचे नियोजनच विस्कळीत होते. नादुरूस्त बसच्या दुरुस्तीसाठी ब्रेक डाऊन वाहनही एसटीच्या ताफ्यात आले आहे. या वाहनामुळे कमीत कमी वेळेत बसची दुरुस्ती करणे शक्य होत आहे.

---

कोरोना काळात बस सेवा काही काळ बंद होती. त्यामुळे गतवर्षी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी राहिले. बस नादुरुस्त होण्यात जवळपास ५० टक्के घट झाली. २०१९ मध्ये ३२५ बसेस नादुरुस्त झाल्या होत्या. जुन्या बस गाड्यांचे प्रमाण विभागात अत्यल्प आहे.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

----

रस्त्यात एस.टी. बंद पडण्याची कारणे

बसस्थानकातून रवाना झाल्यानंतर रस्त्यात एसटी बंद पडण्याची अनेक कारणे आहेत. यात प्रमुख कारण टायर पंक्चर होणे आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या त्रासाला अधिक तोंड द्यावे लागते. त्याबरोबरच इंजिन जाम होणे, रेडिएटरच्या पंख्याचा बेल्ट तुटणे, सस्पेशनमधील बिघाड यासह इतर कारणांमुळे अचानक एसटी ऐन रस्त्यात बंद पडते.

----

दहा वर्षांवरील ११० बसेस

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जवळपास ११० बसगाड्या या १० वर्षांवरील आहे. आरटीओ कार्यालयाच्या नियमानुसार वाहन १५ वर्षे वापरता येते. त्यानंतर वाहनाची पुनर्रनोंदणीची प्रक्रिया करावी लागते. एसटी महामंडळ मात्र एखाद्या बसचा १२ वर्षे अथवा १२ लाख कि.मी. अंतर होईपर्यंत वापर करते. त्यानंतर ती बस स्क्रॅपमध्ये काढली जाते.

---

दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचा हिशोब नाही

प्रत्येक आगार पातळीवर देखभाल-दुरुस्तीसाठी ४० ते ४५ कर्मचारी आहेत. एखादी बस ज्या ठिकाणी नादुरुस्त होते, तेथील जवळच्या आगाराच्या माध्यमातून बसेसची देखभाल-दुरुस्ती केली जाते. महामंडळाचेच कर्मचारी हे काम करतात. त्यासाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध असते. परंतु या देखभाल-दुरुस्तीवर किती खर्च होतो, याचा हिशोब होत नसल्याची परिस्थिती आहे.

--

जिल्ह्यातील एसटी बसेस-५६८

आगारनिहाय बसची संख्या

मध्यवर्ती बसस्थानक - १४७

सिडको बसस्थानक - ९३

पैठण - ६६

सिल्लोड - ६१

वैजापूर - ५५

कन्नड - ५५

गंगापूर - ५२

सोयगाव - ३९