शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

४७ हजार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नांदेड: दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचे जवळपास २२० कोटींचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे़

शिवराज बिचेवार । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ शनिवारी राज्य शासनाने दीड लाख रुपयापर्यंत कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली आहे़ या घोषणेचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचे जवळपास २२० कोटींचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे़ कर्जमाफी, हमीभाव यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी १ जूनपासून संपावर गेला होता़ या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला़ त्यामध्ये कर्जमाफीसंदर्भात काही निकषही घालण्यात आले़ सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाल्यास जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार होता़ अडीच लाख शेतकऱ्यांवर विविध बँकाचे दीड हजार कोटींचे कर्ज होते़ सुरुवातीला या सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होवून सातबारा कोरा होणार अशी भावना झाली होती़, परंतु शनिवारी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबतचे निकष स्पष्ट केले़ त्यानुसार दीड लाख रुपयापर्यंतचे सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे़ परंतु दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असल्यास शेतकऱ्यांना अगोदर त्या वरच्या कर्जाची परतफेड केल्यासच दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे़ जिल्ह्यात दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४७ हजार २७७ एवढी आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांचे सर्वच कर्ज माफ होवून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे़ तर दीड लाखांपेक्षा काही हजारांनी जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ हजार ३८२ आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांना थोडीफार परतफेड करुनही आपला सातबारा कोरा करता येणार आहे़ तर दोन लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे़ त्यांनीही वरच्या कर्जाची परतफेड करुन दीड लाख रुपये माफीचा लाभ मिळणार आहे़ कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात महिन्याला आतापर्यंत सरासरी पाच आत्महत्या होत होत्या़ आता सातबारा कोरा होणाऱ्या शेतकऱ्यांना आगामी काळात कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे़