शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

भूममध्ये ४६ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:19 IST

भूम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती गणातून २९ तर जिल्हा परिषद गटातून १७ जणांनी अशी एकूण ४६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे़

भूम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती गणातून २९ तर जिल्हा परिषद गटातून १७ जणांनी अशी एकूण ४६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे़ तर पंचायत समितीच्या दहा गणात ४४ तर जिल्हा परिषदेच्या चार गटात १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ पाथरुड गटातून छाननी दरम्यान काँगेसच्या मनीषा फाळके यांचा अर्ज बाद झाला होता़ त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने पाथरुड गटाची अर्ज माघार घेण्याची तारीख दिनांक १० फेब्रुवारीपर्यंत वाढून देण्यात आली आहे़ भूम तालुक्यातील सुकटा गटात पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सुकटा गटात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीत तिरंगी सामना होत आहे़ ईट गटातून तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात आहेत़ वालवड गटात चार जणांनी माघार घेतल्याने चौरंगी लढत होत आहे़ आष्टा जिल्हा परिषद गटातून सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे़ तर इथे तिरंगी लढत होत असून, सहा जण निवडणूक रिंगणात आहेत़ पंचायत समितीच्या दहा जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत़ पाथरुड गणातून एकाने माघार घेतल्याने या गणात चौरंगी लढत होत आहे़ आंबी गणातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत़ इथे राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपात तिरंगी लढत होत आहे़ वालवड गणातून तिघांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे़ चिंचोली गणातून चौघे निवडणूक आखाड्यातून बाहेर पडले आहेत़ इथे राष्ट्रवादी, शिवसेना, एक अपक्ष अशी लढत होत आहे़ आष्टा गणातून तिघांनी माघार घेतली असून, इथे पंचरंगी लढत होत आहे़ माणकेश्वर गणातून तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे़ इथेही पंचरंगी लढत होत आहे़ ईट गणातून केवळ एकाने माघार घेतली आहे़ तर इथे चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे़ पखरूड गणातून चार उमेदवारांनी अर्ज निवडणुकीतून माघार घेतली आहे़ इथेही पंचरंगी लढत होणार आहे़ सुकटा गणातून चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे़ या गटात मात्र, प्रमुख पक्षासह इतर असे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ आरसोली गणातून तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने या गणात पंचरंगी लढत होत आहे़