शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

४६ ग्रामपंचायती; मूल्यमापन पूर्ण

By admin | Updated: July 15, 2014 00:53 IST

बालासाहेब काळे, हिंगोली जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सुरू असून ५६५ पैकी ५१९ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले.

बालासाहेब काळे, हिंगोलीजिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सुरू असून ५६५ पैकी ५१९ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले. २०१४-१५ या वर्षात उर्वरित ४६ ग्रामपंचायतींसाठी तंटामुक्ती मोहीम राबविली जात असून जिल्ह्यांतर्गत समित्यांनी नुकतेच मूल्यमापन केले असून त्याचा अहवाल १५ जुलै रोजी सादर केला जाणार आहे. महाराष्ट्रात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली असून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना तंटामुक्त करण्यासाठी समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला. २०१४-१५ या वर्षातील तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी तालुकानिहाय समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. या समित्यांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ५ जून ते ५ जुलै या कालावधीत मूल्यमापन केले. त्याचा अहवाल १५ जुलैपर्यंत गृह मंत्रालयासह पोलिस महासंचालकांना महासंचालकांकडे सादर केला जाणार आहे. औंढा तालुका मूल्यमापन समितीचे अध्यक्ष तहसीलदार श्याम मदनूरकर व पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंदे्र यांनी हिंगोली ग्रामीण व बासंबा ठाणे हद्दीतील १० ग्रामपंचायतींचे तंटामुक्तीसाठी मूल्यमापन केले असून त्याचा अहवाल महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानचे जिल्हा समन्वयक जमादार शेख निजाम यांच्याकडे सादर केला आहे. इतर समित्यांनीही नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींचे मूल्यमापन केले असून त्याचा अहवाल पोलिस मुख्यालयाकडे पाठवला आहे. १६ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत बाह्यमूल्यमापन समितीकडून तंटामुक्त गावांची तपासणी होणार आहे. प्रतीक्षा घोषणेचीमहाराष्ट्रात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन गावागावात जाऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली असून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत.या गावांना तंटामुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात बदल झाला आहे.